शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पीक विम्यासाठी ५ लाख ५८ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:29 IST

प्रधानमंत्री पीकविमा या योजनेसाठी तब्बल ५ लाख ५८ हजार ४१२ शेतकऱ्यांनी बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कं. लि. कडे अर्ज दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा दुष्काळ असल्यामुळे जिल्ह्यात रबीचा पेरा मोठ्या प्रमणात घटला असून ३ जानेवारीपर्यंत ४४ टक्केच रबीचा पेरा झाला आहे. मात्र, पेरलेल्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा या योजनेसाठी तब्बल ५ लाख ५८ हजार ४१२ शेतकऱ्यांनी बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कं. लि. कडे अर्ज दाखल केले आहेत.शेतक-यांसाठी खरीप व रबी पिके खूप महत्वाची असतात. यावरच त्यांच्या कुटुंबाचा गाडा वर्षभर चालतो. पण, अनेकदा पिकांची पेरणी, झाल्यानंतर नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट आदी टाळता न येण्याजोग्या जोखमींवर पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांची हानी झाल्यास त्यांना सुरक्षा कवच मिळते, यासाठी गहू, हरभरा, भुईमूग, ज्वारी, करडई, सूर्यफूल, कांदा या पिकांसाठी आॅक्टोबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत प्रधानमंत्री पीकविमा या योजनेअंतर्गत कोरडवाहू व बागायत शेतक-यांकडून अर्ज घेण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार अशा एकूण तब्बल ५ लाख ५८ हजार ४१२ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत.पिकांचे ५० टक्के नुकसान झाल्यावरच विम्याची मदतदुष्काळ, पावसातील खंड, पूर , क्षेत्र जलमय होणे, किंवा कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग वीज कोसळणे, गारपीट आदी कारणांमुळे पिकांच्या उत्पन्नात येणा-या घटीपासून व्यापक विमा संरक्षण देता येतो. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत, मात्र सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकºयांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा जास्त घट झाल्यास विमा मिळतो.नुकसान भरपाईचे दायित्वयोजनेच्या तरतुदीनुसार नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे. या योजनअंतर्गत एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या ३. ५ पट किंवा एकूण विमा संरक्षित रक्कमेच्या ३५ टक्के यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढी नुकसान भरपाई ही संबंधित विमा कंपनीतर्फे दिली जाईल. त्यापेक्षा जास्त येणारी नुकसान भरपाई ही केंद्र व राज्य शासनातर्फे ५० : ५० म्हणजेच समप्रमाणात दिली जाईल.मुदतीसाठी पात्रनुकसानीच्या अधिसूचनेअगोदर ज्या शेतक-यांनी विमाहप्ता रक्कम भरली आहे. किंवा त्यांच्या खात्यातून विमा रक्कम वजा करून घेण्यात आली आहे. असेच शेतकरी मदतीसाठी पात्र राहणार आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी