शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पीक विम्यासाठी ५ लाख ५८ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:29 IST

प्रधानमंत्री पीकविमा या योजनेसाठी तब्बल ५ लाख ५८ हजार ४१२ शेतकऱ्यांनी बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कं. लि. कडे अर्ज दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा दुष्काळ असल्यामुळे जिल्ह्यात रबीचा पेरा मोठ्या प्रमणात घटला असून ३ जानेवारीपर्यंत ४४ टक्केच रबीचा पेरा झाला आहे. मात्र, पेरलेल्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा या योजनेसाठी तब्बल ५ लाख ५८ हजार ४१२ शेतकऱ्यांनी बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कं. लि. कडे अर्ज दाखल केले आहेत.शेतक-यांसाठी खरीप व रबी पिके खूप महत्वाची असतात. यावरच त्यांच्या कुटुंबाचा गाडा वर्षभर चालतो. पण, अनेकदा पिकांची पेरणी, झाल्यानंतर नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट आदी टाळता न येण्याजोग्या जोखमींवर पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांची हानी झाल्यास त्यांना सुरक्षा कवच मिळते, यासाठी गहू, हरभरा, भुईमूग, ज्वारी, करडई, सूर्यफूल, कांदा या पिकांसाठी आॅक्टोबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत प्रधानमंत्री पीकविमा या योजनेअंतर्गत कोरडवाहू व बागायत शेतक-यांकडून अर्ज घेण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार अशा एकूण तब्बल ५ लाख ५८ हजार ४१२ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत.पिकांचे ५० टक्के नुकसान झाल्यावरच विम्याची मदतदुष्काळ, पावसातील खंड, पूर , क्षेत्र जलमय होणे, किंवा कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग वीज कोसळणे, गारपीट आदी कारणांमुळे पिकांच्या उत्पन्नात येणा-या घटीपासून व्यापक विमा संरक्षण देता येतो. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत, मात्र सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकºयांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा जास्त घट झाल्यास विमा मिळतो.नुकसान भरपाईचे दायित्वयोजनेच्या तरतुदीनुसार नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे. या योजनअंतर्गत एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या ३. ५ पट किंवा एकूण विमा संरक्षित रक्कमेच्या ३५ टक्के यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढी नुकसान भरपाई ही संबंधित विमा कंपनीतर्फे दिली जाईल. त्यापेक्षा जास्त येणारी नुकसान भरपाई ही केंद्र व राज्य शासनातर्फे ५० : ५० म्हणजेच समप्रमाणात दिली जाईल.मुदतीसाठी पात्रनुकसानीच्या अधिसूचनेअगोदर ज्या शेतक-यांनी विमाहप्ता रक्कम भरली आहे. किंवा त्यांच्या खात्यातून विमा रक्कम वजा करून घेण्यात आली आहे. असेच शेतकरी मदतीसाठी पात्र राहणार आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी