शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

By विजय मुंडे  | Updated: May 3, 2024 20:03 IST

मोदींची हवा संपल्याने महाराष्ट्रात दिवसाआड सभा घेत आहेत

जालना : ४०० पार हा नरेंद्र मोदी यांचा जुमला आहे. ते २०० पारही जाणार नाहीत. महाराष्ट्रातील ४८ जागा जिंकू म्हणणारे दर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात येत आहेत. मोदींची हवा संपल्याचा हा असर असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीचे जालना येथील उमेदवार प्रभाकर बकले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जालना शहरातील मामा चौकात आयोजित बैठकीत ते बोलत हाेते. यावेळी प्रभाकर बकले महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे, जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाट, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, महासचिव प्रशांत कसबे, मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, विजय लहाने व इतर पदाधिकारी उपस्थित होते. संविधान आम्ही बदलणार नाही, असे ते सांगत आहेत. परंतु, मोदी सत्तेत आले तर संविधान बदलणार आहेत. २०१४ ते २०२४ किती लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले हा प्रश्न विचारेपर्यंत १७ लाख नागरिकांनी देशाचे नागरिकत्व सोडल्याचा अहवाल आहे. त्यांचा धर्म हिंदू आहे. इलेक्ट्रिकल बॉण्डच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला आहे. देश चालविण्यासाठी हे देशाची संपत्ती विकायला निघाले आहेत. काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार हे एकमेकांचे नातलग आहेत. त्यामुळे कोणीही आले तरी सत्ता त्यांच्या घरात जाणार आहे. लोकशाही टिकवायची असेल तर कुटुंबशाहीला गाढा, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.

काळेंचे गुरू अशोक चव्हाणकाँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचे राजकीय गुरू अशोक चव्हाण आहेत. आज अशोक चव्हाण भाजपात असून, काळे निवडून आले तर तिकडे जाऊन बसतील. काळे, दानवे, औताडे हे एकमेकांचे नातलग आहेत. त्यामुळे इथे झालेल्या निवडणुका नावाला झाल्याची टीका प्रभाकर बकले यांनी केली.

टॅग्स :jalna-pcजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर