शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

११ महिन्यांत ३५ खून, १० दरोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST

जालना : गत ११ महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा खून झाला असून, १० दरोडे पडले आहेत. तर तब्बल २६० घरफोड्या ...

जालना : गत ११ महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा खून झाला असून, १० दरोडे पडले आहेत. तर तब्बल २६० घरफोड्या झाल्या असून इतर चोरीच्या ७२३ घटनांची नोंद पोलीसदप्तरी झाली आहे. याशिवाय जबरी चोरीच्या ६९ घटना घडल्या आहेत.

चालू वर्षात कोरोनामुळे सर्वसामान्यांसमोर एक ना अनेक प्रश्न उभे आहेत. अतिवृष्टी, रोगराईमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. त्यात चालू वर्षात दरोडेखोर, सराईत चोरट्यांसह भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांची झोप उडविली आहे. एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे चोरट्यांनीही सर्वसामान्यांना लुटले आहे. जिल्ह्यात चालू वर्षातील ११ महिन्यांत दहा दरोड्याच्या घटना घडल्या असून, त्यातील सात घटनांचा उलगडा झाला आहे. जबरी चोरीच्या ६९ घटना घडल्या असून ३३ प्रकरणांचा उलगडा झाला आहे. आजवर २६० घरफोड्या झाल्या आहेत. यात दिवसा २८ तर रात्री २३२ घरफोड्या झाल्या आहेत. २६० पैकी ६४ प्रकरणांचा उलगडा झाला आहे. तर इतर चोरीच्या तब्बल ७२३ घटनांची नोंद जिल्ह्यातील पोलीसदप्तरी झाली आहे. त्यातील ३७६ प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावला आहे.

गतवर्षी २०१९ मध्ये जिल्ह्यात खुनाच्या ३६ घटना घडल्या होत्या. तर यावर्षी ३५ घटना घडल्या आहेत. यात प्राणघातक हल्ला प्रकरणात ८९ गुन्हे दाखल दाखल झाले आहेत. एकूणच गतवर्षीपेक्षा चालू वर्षात चोऱ्यांच्या घटना अधिक घडल्या आहेत. त्यातील काही घटनांचा पोलिसांना उलगडा झाला आहे. इतर घटनांचा उलगडा झालेला नाही.

वाहनचाेरांची चांदी

जिल्ह्यात वाहनचोर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. गतवर्षी २०१९ मध्ये जिल्ह्यातून ३३० वाहने चोरीस गेली होती. तर चालू वर्षात ३८२ वाहने चोरीस गेले आहेत. विशेषत: दुचाकीचोरांनी शहरासह जिल्ह्यात उच्छाद मांडला आहे. काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीचोरांना जेरबंद करण्यात आले आहे. मात्र, दुचाकीचोरीचे प्रकार सुरूच आहेत.

चेन स्नॅचिंगला लगाम

गतवर्षी दुचाकीस्वार चोरट्यांनी जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील दागिने लूटल्याच्या १५ घटना घडल्या होत्या. पोलिसांनी चेन स्नॅचिंगच्या या घटनांना चालू वर्षात लगाम लावला आहे. तरीही आजवर चेन स्नॅचिंगचे आठ गुन्हे दाखल झालेले आहेत.

(कोट)

गुन्ह्यांचा तपास सुरू

दाखल गुन्ह्यांची पेंडंन्सी कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. दरोडे, घरफोड्यांसह इतर चोऱ्यांच्या घटनांचा उलगडा झाला आहे. शिवाय, दुचाकीचोरी प्रकरणातील आरोपीही जेरबंद करण्यात आले आहेत. चोऱ्यांच्या घटना थांबविण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून, विशेष पथकांमार्फत सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. कायदा- सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हा पोलीस दल काम करीत आहे.

विनायक देशमुख

पोलीस अधीक्षक, जालना