शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

लोकल रेल्वे बंद असल्याने मुंबईकरांच्या सेवेत मराठवाड्यातील ३२५ बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 19:11 IST

बेस्ट प्रशासनाने मराठवाड्यातील ३५० बसेस मुंबईत चालविण्यासाठी प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत.

ठळक मुद्देमार्च महिन्यापासून बंद झालेली मुंबईतील लोकल रेल्वे अद्याप पूर्व पदावर आलेली नाही. प्रत्येक विभागातून १५ दिवसाला नव्याने चालक- वाहक पाठविले जातात.

- विकास व्होरकटे

जालना : कोरोनामुळे बंद असलेली मुंबईतील लोकल रेल्वेसेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. यातच व्यवसायासह नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना सेवा देणाऱ्या बेस्ट बसेस कमी पडत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने मराठवाड्यातील ३५० बसेस मुंबईत चालविण्यासाठी प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. याला दीड महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे.

मुंबईत आजही नोकरदारांसह व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेथे घराबाहेर पडताना दुचाकीला प्राधान्य दिले जात नसून, लोकल रेल्वेला अधिकची पसंती दिली जाते. असे असतानाच कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद झालेली मुंबईतील लोकल रेल्वे अद्याप पूर्व पदावर आलेली नाही. यातच शासनस्तरावरून कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अटी हळूहळू शिथिल केल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईत घराबाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा परिणाम बेस्ट बसेसवर होत आहे. ही बाब ओळखून मुंबईतील बेस्ट प्रशासनाने मराठवाड्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ३५० बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. या बसेस मुंबईतील लोकल रेल्वे सुरू हो‌ईपर्यंत ठेवल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाहक-चालकांची तपासणीमुंबईत बेस्टद्वारे चालविण्यात येत असलेल्या रा. प.च्या बसेसवर प्रत्येक विभागातून १५ दिवसाला नव्याने चालक- वाहक पाठविले जातात. कोरोनामुळे मुंबईत सेवा बजावून गावाकडे येणाऱ्या चालक- वाहकांची तेथेच कोरोना तपासणी केली जाते. यात कुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यावर तेथेच उपचार केले जातात.

विभागनिहाय बसेस :नांदेड ५०परभणी ५०औरंगाबाद ५०बीड ५०उस्मानाबाद ५०जालना २५लातूर ५०

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या