शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लोकल रेल्वे बंद असल्याने मुंबईकरांच्या सेवेत मराठवाड्यातील ३२५ बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 19:11 IST

बेस्ट प्रशासनाने मराठवाड्यातील ३५० बसेस मुंबईत चालविण्यासाठी प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत.

ठळक मुद्देमार्च महिन्यापासून बंद झालेली मुंबईतील लोकल रेल्वे अद्याप पूर्व पदावर आलेली नाही. प्रत्येक विभागातून १५ दिवसाला नव्याने चालक- वाहक पाठविले जातात.

- विकास व्होरकटे

जालना : कोरोनामुळे बंद असलेली मुंबईतील लोकल रेल्वेसेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. यातच व्यवसायासह नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना सेवा देणाऱ्या बेस्ट बसेस कमी पडत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने मराठवाड्यातील ३५० बसेस मुंबईत चालविण्यासाठी प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. याला दीड महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे.

मुंबईत आजही नोकरदारांसह व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेथे घराबाहेर पडताना दुचाकीला प्राधान्य दिले जात नसून, लोकल रेल्वेला अधिकची पसंती दिली जाते. असे असतानाच कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद झालेली मुंबईतील लोकल रेल्वे अद्याप पूर्व पदावर आलेली नाही. यातच शासनस्तरावरून कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अटी हळूहळू शिथिल केल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईत घराबाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा परिणाम बेस्ट बसेसवर होत आहे. ही बाब ओळखून मुंबईतील बेस्ट प्रशासनाने मराठवाड्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ३५० बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. या बसेस मुंबईतील लोकल रेल्वे सुरू हो‌ईपर्यंत ठेवल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाहक-चालकांची तपासणीमुंबईत बेस्टद्वारे चालविण्यात येत असलेल्या रा. प.च्या बसेसवर प्रत्येक विभागातून १५ दिवसाला नव्याने चालक- वाहक पाठविले जातात. कोरोनामुळे मुंबईत सेवा बजावून गावाकडे येणाऱ्या चालक- वाहकांची तेथेच कोरोना तपासणी केली जाते. यात कुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यावर तेथेच उपचार केले जातात.

विभागनिहाय बसेस :नांदेड ५०परभणी ५०औरंगाबाद ५०बीड ५०उस्मानाबाद ५०जालना २५लातूर ५०

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या