शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

३२ कोटींचा कर थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:49 IST

मालमत्ता आणि अन्य करापोटी जिल्ह्यातील चार नगर परिषदांसह चार नगरपंचायतींचा तब्बल ३२ कोटींचा कर थकला आहे.

जालना : मालमत्ता आणि अन्य करापोटी जिल्ह्यातील चार नगर परिषदांसह चार नगरपंचायतींचा तब्बल ३२ कोटींचा कर थकला आहे. यामध्ये मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी सर्वाधिक आहे. थकबाकीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण केवळ २० टक्के आहे.शासनाकडून मिळणारा विकास निधी, अनुदानाबरोबरच स्थानिक कर वसुलीतून नगर पालिकेला मोठे उत्पन्न मिळते. याचा उपयोग विकास कामांसह नागरी सुविधांशी निगडित आवश्यक खर्च भागविण्यासाठी केला जातो. मात्र मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर, भोकरदन या नगर परिषदांचे कर वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. वसुलीची टक्केवारी वाढण्याऐवजी दरवर्षी कमी होत आहे. त्यामुळे अनेक शासकीय योजनांचा लोकवाटा भरणेही या नगर परिषदांना कठीण जात आहे. शिवाय पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती या कामांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. जालना नगर परिषदेचा थकबाकीचा आकडा २० कोटींवर पोहोचला असून, वसुलीचे प्रमाण केवळ चार कोटींपर्यंत आहे. अंबड नगर परिषदेचा तब्बल पावणेआठ कोटींचा कर थकित असून, वसुलीचा आकडा सव्वा कोटीवर अडकला आहे. परतूर व भोकरदन नगरपषिदेच्या वसुलीचे प्रमाण असमाधानकारक आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी आणि मंठा नगरपंचायतींच्या कर वसुलीचे प्रमाण वीस टक्क्यांवर अडकले आहे. वीजबिलाची थकबाकी न भरल्यामुळे मागील आठवड्यात मंठा पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. आर्थिक अडचणींमुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. सर्व नगरपालिका व नगर पंचायतींनी मार्चअखेर कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आदेश विभागीय आयुक्तांनी मुख्याधिका-यांना दिले होते. मात्र त्यासाठी आवश्यक प्रयत्न झालेले दिसत नाहीत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ३२ कोटी ६८ लाख, तीन हजार रुपये असणा-या थकबाकीच्या तुलनेत वसुलीचा आकडा सहा कोटी ८४ लाख ७३ लाख इतका आहे. आठही पालिकांच्या कर वसुलीचे हे प्रमाण केवळ २०.९५ इतके आहे. आता मार्चअखेर कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे फारच कठीण दिसत असून, पालिका क्षेत्रातील विकास कामांना याचा फटका बसणार आहे.----------------कर वसुली कमी असेल विकास कामांसाठी मिळणारा निधी व अनुदानात कपात करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे किमान ८० टक्के कर वसुली पूर्ण करा, अशी नोटीस विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींना दिली होती. आतापर्यंत केवळ २१ टक्केच वसुली पूर्ण झाली आहे. मार्चअखेर वसुली वाढविण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत.- उमेश कोटीकर, प्रशासकीय अधिकारी, नगरपालिका प्रशासन.