शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

३२ कोटींचा कर थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:49 IST

मालमत्ता आणि अन्य करापोटी जिल्ह्यातील चार नगर परिषदांसह चार नगरपंचायतींचा तब्बल ३२ कोटींचा कर थकला आहे.

जालना : मालमत्ता आणि अन्य करापोटी जिल्ह्यातील चार नगर परिषदांसह चार नगरपंचायतींचा तब्बल ३२ कोटींचा कर थकला आहे. यामध्ये मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी सर्वाधिक आहे. थकबाकीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण केवळ २० टक्के आहे.शासनाकडून मिळणारा विकास निधी, अनुदानाबरोबरच स्थानिक कर वसुलीतून नगर पालिकेला मोठे उत्पन्न मिळते. याचा उपयोग विकास कामांसह नागरी सुविधांशी निगडित आवश्यक खर्च भागविण्यासाठी केला जातो. मात्र मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर, भोकरदन या नगर परिषदांचे कर वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. वसुलीची टक्केवारी वाढण्याऐवजी दरवर्षी कमी होत आहे. त्यामुळे अनेक शासकीय योजनांचा लोकवाटा भरणेही या नगर परिषदांना कठीण जात आहे. शिवाय पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती या कामांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. जालना नगर परिषदेचा थकबाकीचा आकडा २० कोटींवर पोहोचला असून, वसुलीचे प्रमाण केवळ चार कोटींपर्यंत आहे. अंबड नगर परिषदेचा तब्बल पावणेआठ कोटींचा कर थकित असून, वसुलीचा आकडा सव्वा कोटीवर अडकला आहे. परतूर व भोकरदन नगरपषिदेच्या वसुलीचे प्रमाण असमाधानकारक आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी आणि मंठा नगरपंचायतींच्या कर वसुलीचे प्रमाण वीस टक्क्यांवर अडकले आहे. वीजबिलाची थकबाकी न भरल्यामुळे मागील आठवड्यात मंठा पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. आर्थिक अडचणींमुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. सर्व नगरपालिका व नगर पंचायतींनी मार्चअखेर कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आदेश विभागीय आयुक्तांनी मुख्याधिका-यांना दिले होते. मात्र त्यासाठी आवश्यक प्रयत्न झालेले दिसत नाहीत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ३२ कोटी ६८ लाख, तीन हजार रुपये असणा-या थकबाकीच्या तुलनेत वसुलीचा आकडा सहा कोटी ८४ लाख ७३ लाख इतका आहे. आठही पालिकांच्या कर वसुलीचे हे प्रमाण केवळ २०.९५ इतके आहे. आता मार्चअखेर कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे फारच कठीण दिसत असून, पालिका क्षेत्रातील विकास कामांना याचा फटका बसणार आहे.----------------कर वसुली कमी असेल विकास कामांसाठी मिळणारा निधी व अनुदानात कपात करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे किमान ८० टक्के कर वसुली पूर्ण करा, अशी नोटीस विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींना दिली होती. आतापर्यंत केवळ २१ टक्केच वसुली पूर्ण झाली आहे. मार्चअखेर वसुली वाढविण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत.- उमेश कोटीकर, प्रशासकीय अधिकारी, नगरपालिका प्रशासन.