शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

३ लाख मे. टन चारा उत्पादनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:43 IST

जवळपास तीन लाख मेट्रिक टन चारा निर्मितीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा केवळ ६२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाईसह चारा टंचाईने शेतकरी तसेच पशुपालक धास्तावले आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने पाणी टंचाईचा ११ कोटी रूपयांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. तर चारा उत्पादनासाठी देखील नियोजन केले आहे. जवळपास तीन लाख मेट्रिक टन चारा निर्मितीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८६ मि.मिलमीटर एवढी आहे. असे असताना केवळ ४२४ मि.मी. एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगाताील पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. पिकांचे उत्पादन घटले असून, रबी हंगामातही जिल्ह्यात यावेळी केवळ १९ टक्के पेरणी झाली आहे. याचे मोठे नुकसान चारा निर्मितीला बसले झाले आहे. चाऱ्याचे आजचे भाव हे कधी नव्हे वाढलेले आहेत. एक पेंडी थेट २० रूपयांना विकली जात आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आता जिल्हा प्रशासनाने ज्याकाही गाळपेºयाच्या जमिनी आहेत तेथे मका चारा निर्मिर्तीला भर दिला आहे.त्यासाठी वेळप्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा विचारही प्रशासकीय पातळीवर केला जात आहे.जालना जिल्ह्यात चारा पे-याचे क्षेत्र दोन लाख ६९ हजार हेक्टर असल्याचे सांगण्यात आले.या पे-यात चारा निर्मिती करून त्यातून तीन लाख मेट्रीक टन चारा निर्मिती होऊ शकते,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जनावरांच्या चा-याचा प्रश्न तर सुटेल, परंतु जनावरांना ऐन उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन कसे करावे, या चिंतेत आता पशुपालक आणि प्रशासन असल्याचे सांगण्यात आले.उसाचा पर्याय ठरू शकतो साह्यकारीचाराटंचाईवर मात करण्यासाठी उसाचा पर्याय असून, घनसावंगी आणि अंबड तालुक्यात उसाचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे. ऊस तोडून जो वरील हिरवा भाग राहतो, त्याचा उपयोग जनावरांच्या चा-यासाठी अनेक शेतकरी करतात. त्यामुळे एक ते दोन महिने हा उसाचा अर्थात वाडे चा-याला पर्याय ठरू शकतो असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यंदा रबी पेरणीत ज्वारी आणि बाजरी नसल्याने पुढील वर्षी चाराटंचाई आणखी गंभीर होऊ शकते.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ