शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

३ लाख मे. टन चारा उत्पादनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:43 IST

जवळपास तीन लाख मेट्रिक टन चारा निर्मितीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा केवळ ६२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाईसह चारा टंचाईने शेतकरी तसेच पशुपालक धास्तावले आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने पाणी टंचाईचा ११ कोटी रूपयांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. तर चारा उत्पादनासाठी देखील नियोजन केले आहे. जवळपास तीन लाख मेट्रिक टन चारा निर्मितीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८६ मि.मिलमीटर एवढी आहे. असे असताना केवळ ४२४ मि.मी. एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगाताील पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. पिकांचे उत्पादन घटले असून, रबी हंगामातही जिल्ह्यात यावेळी केवळ १९ टक्के पेरणी झाली आहे. याचे मोठे नुकसान चारा निर्मितीला बसले झाले आहे. चाऱ्याचे आजचे भाव हे कधी नव्हे वाढलेले आहेत. एक पेंडी थेट २० रूपयांना विकली जात आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आता जिल्हा प्रशासनाने ज्याकाही गाळपेºयाच्या जमिनी आहेत तेथे मका चारा निर्मिर्तीला भर दिला आहे.त्यासाठी वेळप्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा विचारही प्रशासकीय पातळीवर केला जात आहे.जालना जिल्ह्यात चारा पे-याचे क्षेत्र दोन लाख ६९ हजार हेक्टर असल्याचे सांगण्यात आले.या पे-यात चारा निर्मिती करून त्यातून तीन लाख मेट्रीक टन चारा निर्मिती होऊ शकते,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जनावरांच्या चा-याचा प्रश्न तर सुटेल, परंतु जनावरांना ऐन उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन कसे करावे, या चिंतेत आता पशुपालक आणि प्रशासन असल्याचे सांगण्यात आले.उसाचा पर्याय ठरू शकतो साह्यकारीचाराटंचाईवर मात करण्यासाठी उसाचा पर्याय असून, घनसावंगी आणि अंबड तालुक्यात उसाचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे. ऊस तोडून जो वरील हिरवा भाग राहतो, त्याचा उपयोग जनावरांच्या चा-यासाठी अनेक शेतकरी करतात. त्यामुळे एक ते दोन महिने हा उसाचा अर्थात वाडे चा-याला पर्याय ठरू शकतो असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यंदा रबी पेरणीत ज्वारी आणि बाजरी नसल्याने पुढील वर्षी चाराटंचाई आणखी गंभीर होऊ शकते.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ