शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धरणे आंदोलनात २५१ जणांचे मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:50 IST

खेड्यातून माणसे आता कामधंद्यासाठी शहराकडे जात असल्याने खेडी ओस पडत आहेत. असे विदारक चित्र असल्याने शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवत आहे. या गंभीर बाबींकडे आता मराठा समाजातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन नाटकार प्रा. राजकुमार तांगडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाज शेतीवरच अवलंबून आहे, शेतीमालास भाव नाही, शेतीची झालेली दयनीय अवस्था, यामुळे बँकाकडे शेतजमिनी गहाण पडलेल्या आहेत.खेड्यातून माणसे आता कामधंद्यासाठी शहराकडे जात असल्याने खेडी ओस पडत आहेत. असे विदारक चित्र असल्याने शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवत आहे. या गंभीर बाबींकडे आता मराठा समाजातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन नाटकार प्रा. राजकुमार तांगडे यांनी केले. त्यांनी रविवारी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनास भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे विदारक चित्र मांडले.रविवारी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. यात समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला. रविवारी २५१ जणांनी आरक्षणाची घोषणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासनाचा निषेध नोंदविला. आरक्षण आमच्या हक्काच...नाही कुणाच बापाच...एक मराठा..लाख मराठा..अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आगामी दोन दिवस (ता.८) पर्यंत मुंडण आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यानंतर सर्व गोळा केलेली केस हे जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत.नाटककार राजकुमार तांगडे, सिने कलावंत, दिग्दर्शक संभाजी तांगडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संवाद साधला. राज्यकर्त्यांकडुन होत असलेली दिशाभूल, तकलादू घोषणांची न होणारी अंमलबजावणी जाती-जातीत संघर्ष पेटविण्यासाठी केलेला बुध्दीभेद या सगळ्यांची चिरफाड करत राजकुमार तांगडे यांनी शासनाचा खरपूस समाचार घेतला. महाबंपर नौकर भरतीस अडवू नका असे म्हणणाºयांनी चार वर्षात ज्या तरूणांचे वय निघून गेले, त्यांच्या भवितव्याचा विचार का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करून रक्ताचे पाणी करत उभारलेला लढा सुरू ठेवावा या लढ्याच्या यशानंतर शेतमालासाठी असाच लढा उभारण्याचे आवाहन तांगडे यांनी केले. संभाजी तांगडे यांनी पोवाड्यातून छत्रपती शिवरायांनी अठरा-पगड जातींना सोबत घेऊन सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्ष साकारली याचे वर्णन केले. यावेळी समाज बांधवांसह तरूण, महिला व विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.जालना : गोळेगाव येथील नदीपात्रात तरूणांचे आंदोलनआष्टी : परतूर तालुक्यातील गोळेगाव येथील तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी रविवारी सकाळी गोदवरी नदीपात्रात जाऊन आंदोलन केले. यावेळी सरकारची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात सकल मराठा समाजातील युवकांची मोठी उपस्थिती होती. तहसीलदार डी. डी. फुफाटे यांनी हे मागण्यांचे निवेदन तातडीने वरिष्ठांना पाठविण्यात येईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी चोख बंदोस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन