शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

धरणे आंदोलनात २५१ जणांचे मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:50 IST

खेड्यातून माणसे आता कामधंद्यासाठी शहराकडे जात असल्याने खेडी ओस पडत आहेत. असे विदारक चित्र असल्याने शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवत आहे. या गंभीर बाबींकडे आता मराठा समाजातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन नाटकार प्रा. राजकुमार तांगडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाज शेतीवरच अवलंबून आहे, शेतीमालास भाव नाही, शेतीची झालेली दयनीय अवस्था, यामुळे बँकाकडे शेतजमिनी गहाण पडलेल्या आहेत.खेड्यातून माणसे आता कामधंद्यासाठी शहराकडे जात असल्याने खेडी ओस पडत आहेत. असे विदारक चित्र असल्याने शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवत आहे. या गंभीर बाबींकडे आता मराठा समाजातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन नाटकार प्रा. राजकुमार तांगडे यांनी केले. त्यांनी रविवारी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनास भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे विदारक चित्र मांडले.रविवारी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. यात समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला. रविवारी २५१ जणांनी आरक्षणाची घोषणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासनाचा निषेध नोंदविला. आरक्षण आमच्या हक्काच...नाही कुणाच बापाच...एक मराठा..लाख मराठा..अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आगामी दोन दिवस (ता.८) पर्यंत मुंडण आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यानंतर सर्व गोळा केलेली केस हे जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत.नाटककार राजकुमार तांगडे, सिने कलावंत, दिग्दर्शक संभाजी तांगडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संवाद साधला. राज्यकर्त्यांकडुन होत असलेली दिशाभूल, तकलादू घोषणांची न होणारी अंमलबजावणी जाती-जातीत संघर्ष पेटविण्यासाठी केलेला बुध्दीभेद या सगळ्यांची चिरफाड करत राजकुमार तांगडे यांनी शासनाचा खरपूस समाचार घेतला. महाबंपर नौकर भरतीस अडवू नका असे म्हणणाºयांनी चार वर्षात ज्या तरूणांचे वय निघून गेले, त्यांच्या भवितव्याचा विचार का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करून रक्ताचे पाणी करत उभारलेला लढा सुरू ठेवावा या लढ्याच्या यशानंतर शेतमालासाठी असाच लढा उभारण्याचे आवाहन तांगडे यांनी केले. संभाजी तांगडे यांनी पोवाड्यातून छत्रपती शिवरायांनी अठरा-पगड जातींना सोबत घेऊन सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्ष साकारली याचे वर्णन केले. यावेळी समाज बांधवांसह तरूण, महिला व विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.जालना : गोळेगाव येथील नदीपात्रात तरूणांचे आंदोलनआष्टी : परतूर तालुक्यातील गोळेगाव येथील तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी रविवारी सकाळी गोदवरी नदीपात्रात जाऊन आंदोलन केले. यावेळी सरकारची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात सकल मराठा समाजातील युवकांची मोठी उपस्थिती होती. तहसीलदार डी. डी. फुफाटे यांनी हे मागण्यांचे निवेदन तातडीने वरिष्ठांना पाठविण्यात येईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी चोख बंदोस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन