शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

२५० कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:54 IST

जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठीचा २५० कोटी ९० लाख रूपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठीचा २५० कोटी ९० लाख रूपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक पार पडली. मंजूर निधी खर्च न करणाऱ्या अधिकाºयांवर कारवाईचा इशाराही दिला आहे.यावेळी दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य नागरे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक समाधान पवार, अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.वार्षिक योजनेतून सर्वसाधारण घटकांसाठी १७५ कोटी ९० लक्ष रुपयांपैकी केंद्र पुरस्कृत योजनांसाठी ६८ कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी २६ कोटी ३८ लाख, नैसर्गिक आपत्ती आणि टंचाईसाठी १७ कोटी ६० लक्ष, नाविन्यपूर्ण योजनेसाठी ८ कोटी ९४ लाख तर जिल्ह्यातील इतर विकासकामांसाठी ५४ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये गाभाक्षेत्रासाठी ११६ कोटी रुपये तर बिगर गाभाक्षेत्रासाठी १६ कोटी ९४ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.गेल्यावर्षी २७७ कोटी ७६ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी प्राप्त झालेल्या २०९ कोटी रुपयांपैकी ८३ कोटी ४० लाख यंत्रणांना देण्यात आलेल्या निधीपैकी डिसेंबर अखेरपर्यंत ७६ कोटी ४० लाख रुपये विविध यंत्रणांनी विकासकामांवर खर्च केले असल्याचे सांगत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासा साठी शासनामार्फत देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याची जबाबदारी सर्व यंत्रणांची असल्याचे लोणीकरांनी यावेळी स्पष्ट केले.दरवर्षी जिल्ह्यात साडेचार हजार विहिरींचे उद्दिष्टशासनाने जालना जिल्ह्यात दरवर्षी साडेचार हजार सिंचन विहिरी उभारण्याचे उद्दिष्ट दिले होते. गेल्या काळात केवळ दोन हजार विहिरी करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक आयोजित करुन जिल्ह्यासाठी १८ हजार सिंचन विहिरी मंजूर करुन घेतल्या आहेत. अधिका-यांच्या उदासिनतेमुळे गतकाळात या विहिरी होऊ न शकल्याची खंत व्यक्त करत आॅनलाइन मस्टर भरण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असून, गटविकास अधिका-यांनीही यात वैयक्तिक लक्ष घालून या सिंचन विहिरी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कामात दिरंगाई करणा-या अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री लोणीकर यांनी बैठकीत दिले.अवैधरीत्या वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक करणा-याविरूध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात अवैध वाळूचा उपसा आणि त्याची वाहतूक करणा-यांवर पोलीसांसह महसूलने वचक ठेवावा. नसता, संबंधित अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेशही यावेळी जिल्हाधिका-यांना दिले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाfundsनिधीBabanrao Looneykarबबनराव लोणीकर