शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

२५० कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:54 IST

जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठीचा २५० कोटी ९० लाख रूपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठीचा २५० कोटी ९० लाख रूपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक पार पडली. मंजूर निधी खर्च न करणाऱ्या अधिकाºयांवर कारवाईचा इशाराही दिला आहे.यावेळी दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य नागरे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक समाधान पवार, अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.वार्षिक योजनेतून सर्वसाधारण घटकांसाठी १७५ कोटी ९० लक्ष रुपयांपैकी केंद्र पुरस्कृत योजनांसाठी ६८ कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी २६ कोटी ३८ लाख, नैसर्गिक आपत्ती आणि टंचाईसाठी १७ कोटी ६० लक्ष, नाविन्यपूर्ण योजनेसाठी ८ कोटी ९४ लाख तर जिल्ह्यातील इतर विकासकामांसाठी ५४ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये गाभाक्षेत्रासाठी ११६ कोटी रुपये तर बिगर गाभाक्षेत्रासाठी १६ कोटी ९४ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.गेल्यावर्षी २७७ कोटी ७६ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी प्राप्त झालेल्या २०९ कोटी रुपयांपैकी ८३ कोटी ४० लाख यंत्रणांना देण्यात आलेल्या निधीपैकी डिसेंबर अखेरपर्यंत ७६ कोटी ४० लाख रुपये विविध यंत्रणांनी विकासकामांवर खर्च केले असल्याचे सांगत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासा साठी शासनामार्फत देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याची जबाबदारी सर्व यंत्रणांची असल्याचे लोणीकरांनी यावेळी स्पष्ट केले.दरवर्षी जिल्ह्यात साडेचार हजार विहिरींचे उद्दिष्टशासनाने जालना जिल्ह्यात दरवर्षी साडेचार हजार सिंचन विहिरी उभारण्याचे उद्दिष्ट दिले होते. गेल्या काळात केवळ दोन हजार विहिरी करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक आयोजित करुन जिल्ह्यासाठी १८ हजार सिंचन विहिरी मंजूर करुन घेतल्या आहेत. अधिका-यांच्या उदासिनतेमुळे गतकाळात या विहिरी होऊ न शकल्याची खंत व्यक्त करत आॅनलाइन मस्टर भरण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असून, गटविकास अधिका-यांनीही यात वैयक्तिक लक्ष घालून या सिंचन विहिरी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कामात दिरंगाई करणा-या अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री लोणीकर यांनी बैठकीत दिले.अवैधरीत्या वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक करणा-याविरूध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात अवैध वाळूचा उपसा आणि त्याची वाहतूक करणा-यांवर पोलीसांसह महसूलने वचक ठेवावा. नसता, संबंधित अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेशही यावेळी जिल्हाधिका-यांना दिले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाfundsनिधीBabanrao Looneykarबबनराव लोणीकर