शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

जालन्यात २३ अपक्ष उमेदवार, अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी

By विजय मुंडे  | Updated: April 27, 2024 19:45 IST

लोकसभेचा आखाडा : यंदाच्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार राहणार नाही.

जालना : जालना लोकसभा निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेत १२ जणांचे अर्ज बाद झाले असून, ३५ जणांचे अर्ज राहिले आहेत. त्यातही विविध पक्षाकडून उमेदवारी मिळविणारे १२ आणि अपक्ष २३ उमेदवार आहेत. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी २९ एप्रिलची मुदत असून, या मुदतीत किती उमेदवार निवडणुकीतून माघार घेतात याकडे लक्ष लागले आहे. विशेषत: अधिकाधिक अपक्षांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी पदाधिकाऱ्यांकडूनही मनधरणी केली जात आहे.

चौथ्या टप्प्यात होणाऱ्या जालना लोकसभा निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. या निवडणुकीसाठी महायुतीकडून रावसाहेब दानवे, मविआकडून डॉ. कल्याण काळे, वंचितकडून प्रभाकर बकले यांना उमेदवारी मिळाली आहे. शिवाय अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत ४७ जणांनी ६७ अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रिया शुक्रवारी २६ एप्रिल रोजी पार पडली. त्यात १२ जणांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. तर आता ३५ उमेदवारांचे अर्ज राहिले असून, त्यातही अपक्षांची संख्या २३ आहे. अधिकाधिक अपक्ष निवडणूक रिंगणात राहिले तर मतांचे विभाजन होणार आहे आणि पर्यायाने याचा फटका प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना बसणार आहे. त्यामुळे अपक्षांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे. परंतु, २९ एप्रिल पर्यंत किती अपक्ष निवडणुकीतून माघार घेणार आणि कितीजण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार याकडेच मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

एकही महिला उमेदवार नाहीजालना लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत निला गौतम काकडे या एकमेव अपक्ष महिला उमेदवारांनी अर्ज केला होता. परंतु, छाननी प्रक्रियेत निला काकडे यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार राहणार नाही.

टॅग्स :jalna-pcजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४