शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मागील वर्षीच्या खरीप हंगाम नुकसानीपोटी जालन्यातील शेतकऱ्यांना मिळणार २०३ कोटींचे अनुदान

By विजय मुंडे  | Updated: June 14, 2023 19:03 IST

जालना जिल्ह्यात १९ महसूल मंडळातील; 'स्वाभिमानी'च्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून केले स्वागत

वडीगोद्री : गतवर्षी पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांच्या नुकसान भरपाईपोटी १५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील १९ मंडळांतील शेतकऱ्यांना २०३ कोटी रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी वडीगोद्री येथे फटाके फोडून स्वागत करण्यात आले.

मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाच्या नुकसान भरपाई अनुदान मदतीतून जिल्ह्यातील १९ महसूल मंडळातील शेकडो गावे वगळण्यात आली होती. फळबाग व खरीप पिकांचे नुकसान होऊनही नुकसान अनुदानाला हजारो शेतकरी मुकले होते. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयासह राज्य शासनास निवेदने देण्यात आली. तसेच वेळोवेळी पाठपुरावा करून, धरणे आंदोलन, रास्ता रोको, जिल्हा कचेरी समोर मुंडन आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शासनाने अनुदान देण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या शासन निर्णयाचे स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, दादासाहेब घाडगे, जेष्ठ नेते पांडुरंग बांगर, अंकुश तारख, बाबासाहेब दखने, शिवाजी रोडी, उमेश बर्वे, श्रीधर केजभट, अजिंक्य घाडगे आदींची उपस्थिती होती.

२०३ कोटी रुपये अनुदान मिळणारगेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या दीड ते दुप्पट पाऊस झाला होता. सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसान अनुदानातून वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, यासाठी आंदोलने करण्यात आली हाेती. शासन निर्णयानुसार आता जिल्ह्यातील १९ महसूल मंडळातील ३२५ गावातील २ लाख १५ हजार शेतकऱ्यांना २०३ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे.- सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

या महसूल मंडळाला मिळणार लाभजिल्ह्यातील आन्वा, हसनाबाद, गोसावी पांगरी, वरुड, सातोना, आष्टी, श्रीष्टी, पाचनवडगाव, विरेगाव, नेर, सेवली, वाघुळ, जालना शहर, रोशनगाव, बावणे पांगरी, दाभाडी, वडीगोद्री, कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र