शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

मागील वर्षीच्या खरीप हंगाम नुकसानीपोटी जालन्यातील शेतकऱ्यांना मिळणार २०३ कोटींचे अनुदान

By विजय मुंडे  | Updated: June 14, 2023 19:03 IST

जालना जिल्ह्यात १९ महसूल मंडळातील; 'स्वाभिमानी'च्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून केले स्वागत

वडीगोद्री : गतवर्षी पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांच्या नुकसान भरपाईपोटी १५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील १९ मंडळांतील शेतकऱ्यांना २०३ कोटी रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी वडीगोद्री येथे फटाके फोडून स्वागत करण्यात आले.

मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाच्या नुकसान भरपाई अनुदान मदतीतून जिल्ह्यातील १९ महसूल मंडळातील शेकडो गावे वगळण्यात आली होती. फळबाग व खरीप पिकांचे नुकसान होऊनही नुकसान अनुदानाला हजारो शेतकरी मुकले होते. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयासह राज्य शासनास निवेदने देण्यात आली. तसेच वेळोवेळी पाठपुरावा करून, धरणे आंदोलन, रास्ता रोको, जिल्हा कचेरी समोर मुंडन आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शासनाने अनुदान देण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या शासन निर्णयाचे स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, दादासाहेब घाडगे, जेष्ठ नेते पांडुरंग बांगर, अंकुश तारख, बाबासाहेब दखने, शिवाजी रोडी, उमेश बर्वे, श्रीधर केजभट, अजिंक्य घाडगे आदींची उपस्थिती होती.

२०३ कोटी रुपये अनुदान मिळणारगेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या दीड ते दुप्पट पाऊस झाला होता. सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसान अनुदानातून वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, यासाठी आंदोलने करण्यात आली हाेती. शासन निर्णयानुसार आता जिल्ह्यातील १९ महसूल मंडळातील ३२५ गावातील २ लाख १५ हजार शेतकऱ्यांना २०३ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे.- सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

या महसूल मंडळाला मिळणार लाभजिल्ह्यातील आन्वा, हसनाबाद, गोसावी पांगरी, वरुड, सातोना, आष्टी, श्रीष्टी, पाचनवडगाव, विरेगाव, नेर, सेवली, वाघुळ, जालना शहर, रोशनगाव, बावणे पांगरी, दाभाडी, वडीगोद्री, कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र