शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

२०० महिलांचा कुटुंब नियोजनात पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST

जालना : जिल्ह्यात मागील दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. असे ...

जालना : जिल्ह्यात मागील दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी पुरूषांनी मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकडे कानाडोळा केला आहे. गत महिन्यापासून जिल्ह्यात २०० महिलांनी शस्त्रक्रिया केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जगात लोकसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविण्यात येतो. जे महिला व पुरूष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतात. त्यांना शासनातर्फे मदतदेखील केली जाते. सर्वसामान्य महिलेला २५० रूपये तर अनुसूचित जाती जमाती, दारिद्र्य रेषेखालील महिलांना ६५० रूपये दिले जातात. पुरूषांनी नियोजन शस्त्रक्रिया केली तर १०० रूपये दिले जातात.

मागील दहा ते अकरा महिन्यांपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. याचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेवरही परिणाम झाला. मागील दहा ते अकरा महिन्यांपासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. लॉकडाऊनला शिथिलता मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने मागील महिन्यापासून पुन्हा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. आतापर्यंत २०० महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

हसनाबाद आरोग्य केंद्रात सर्वाधिक शस्त्रक्रिया

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील आरोग्य केंद्रात सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या केंद्रात ५१ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर रेणुकाई पिंपळगाव ३८, दहिफळ खंदारे २५, ढोकसाळ ३२, वाटूर १२, खासगाव १७, तर शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंद होत्या. मागील महिन्यापासून शस्त्रक्रियेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात २०० महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या आहेत. एकाही पुरूषाने शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला नाही. महिलांसह पुरूषांनीही शस्त्रक्रिया करावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.