शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

वाळू उपशाने घेतला दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:29 IST

अवैधपणे वाळूचा उपसा करत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने दोन युवकांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : अवैधपणे वाळूचा उपसा करत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने दोन युवकांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अनिकेत विक्रम तराळ (१७), योगेश कोंडीबा तराळ (२१) असे मृत युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे. परिणामी तालुक्यातील प्रमुख नद्यांची चाळणी झाली आहे. याकडे महसूल प्रशासनाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. शनिवारी २३ मार्च रोजी अशाच प्रकारे ट्रॅक्टर घेऊन वाळूचा उपसा करण्यासाठी मयत रात्री ९ वाजेच्या दरम्यान भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावच्या लगत असलेल्या केळणा नदीच्या पात्रातून ट्रॅक्ट्ररमध्ये वाळू भरण्यासाठी गेले होते. पात्रातील वाळूच्या खड्यात अनिकेत विक्रम तराळ व योगेश कोंडीबा तराळ हे दोघे खड्ड्यातून वाळू भरून वर देत होते. तर उभे असलेले त्यांचे साथीदार वाळूने भरलेले टोपले ट्रॅक्ट्ररमध्ये टाकण्याचे काम करीत होते. ट्रॅक्टर भरत असतानाच पात्रातील खड्डयावरील बाजू अचानक कोसळल्याने अनिकेत तराळ व योगेश तराळ हे दोघे चुलत भाऊ खड्ड्यात दबले गेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे खड्ड्याच्यावर असलेल्या त्यांच्या तीन साथीदारांनी घाबरुन नदीपात्रातून घराकडे धूम ठोकली. घडलेल्या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी तातडीने नदीपात्रात जाऊन वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या तराळ बंधूना बाहेर काढले, ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंदन इमले, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोन्ने, पोलीस उपनिरीक्षक अमन सिरसाठ, कर्मचारी नागरगोजे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेची भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.नदीपात्र : कपारे ठरताहेत मजुरांसाठी कर्दनकाळतालुक्यात मोठ्या प्रमाणात रात्री वाळूची तस्करी करण्यात येत आहे. यामुळे केळणा, गिरजा, पूर्णा या नदीपात्रात मोठे कपारे पडले आहेत. या कपा-याच्या आत चांगल्या दर्जाची वाळू मिळत असल्याच्या हव्यासापोटी वाळू माफिया रात्रं - दिवस मजुरांच्या माध्यमातून उपसा करत आहेत. त्यामुळे कपार कोसळण्याची भीती अधिक असते. गेल्या वर्षी देखील कोदोली शिवारात केळणा नदीच्या पात्रात अशाच प्रकारे एका मजुराचा मृत्यू झाला होता. रात्रीच्या वेळी मजुरांना जास्तीचा मोबदला मिळतो. त्यामुळे जीव धोक्यात घालून अनेक मजूर काम करतात. मात्र महसूल व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Deathमृत्यूsandवाळूSmugglingतस्करी