शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

२० कोटींची बिले ३ मिनिटात मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:51 AM

गेल्या आर्थिक वर्षात वेगवेगळ्या विकास कामांवर करण्यात आलेल्या खर्चाची देयके या न त्या कारणांमुळे लांबणीवर पडली होती. ही देयके मंजूर करावयाची झाल्यास त्याला विशेष सभेची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अवघ्या काही मिनिटात दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या आर्थिक वर्षात वेगवेगळ्या विकास कामांवर करण्यात आलेल्या खर्चाची देयके या न त्या कारणांमुळे लांबणीवर पडली होती. ही देयके मंजूर करावयाची झाल्यास त्याला विशेष सभेची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अवघ्या काही मिनिटात दिली.ही विशेष सभा मध्यंतरी औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य निवडणुकीमुळे होऊ शकली नाही. आणि आता पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. ही बाब लक्षात घेता तातडीने विशेष सभा सोमवारी घेण्यात आली.जालना पालिकेची विशेष सभा सोमवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह विषय समित्यांचे सभापती तसेच मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, विभागप्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी गेल्या आर्थिक वर्षात रस्ते, देखभाल दुरूस्ती यासह विविध कामांची जवळपास २० कोटी रूपयांपेक्षा अधिकची देयके मंजुरीविना रखडली होती. या बिलांना मंजुरी देताना सभागृहात कोणत्याही नगरसेवकाने आक्षेप न घेता मंजूर- मंजूरच्या घोषणेत मान्यता देण्यात आली.गणेश विसर्जन दोन दिवसांवर आले आहे. असे असताना शहरातील रस्त्यांवरील खड्डे, बंद पथदिवे आणि स्वच्छतेचा मुद्दा सभागृहात गाजला. शिवसेनेचे गटनेते विष्णू पाचफुले, भाजपचे गटनेते अशोक पांगरकर, भास्कर दानवे यांच्यासह महिलांनी आपापल्या प्रभागातील प्रश्न मांडले. बहुतांश ठिकाणी पथदिव्यांचा मुद्दा गाजला. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी मध्यस्थी करून गणेश विसर्जनापूर्वी मिरवणूक मार्ग, पथदिवे सुरू करण्याचे निर्देश दिले.जलवाहिनीच्या मुद्यावर चर्चासभागृहामध्ये अंतर्गत जलवाहिनीचा मुद्दा देखील पुन्हा चर्चिला गेला. शहर तसेच आसपास मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे अनेक नगरसेवकांनी सांगितले. मुख्याधिकारी नार्वेकर यांनी यामध्ये लक्ष घालून गळतीचे कारण शोधले जाईल, असे सांगितले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदnagaradhyakshaनगराध्यक्षcivic issueनागरी समस्याbillबिल