शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जालना जिल्ह्यातील १८३ सेवानिवृत्त शिक्षक २० हजारांवर काम करण्यास तयार

By विजय मुंडे  | Updated: July 29, 2023 16:54 IST

ज्ञानमंदिरात जाऊन पुन्हा मुलांना देणार धडे; सेवानिवृत्त शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केला अर्ज

जालना : शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांना २० हजार रुपये मानधनावर कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १८३ सेवानिवृत्त शिक्षकांनी ज्ञानमंदिरात जाऊन मुलांना धडे देण्याची तयारी दर्शविली आहे.

जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १५०२ शाळांमध्ये एक लाख ४७ हजार २८७ मुलं शिक्षण घेतात; परंतु या शाळांमध्ये मराठी माध्यमातील ५६७ तर उर्दू माध्यमातील ५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेषत: शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, शाळांना शिक्षक मिळावेत यासाठी पालकांनी कधी शाळेला टाळे ठोकले, कधी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले तर कधी चक्क शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरविली; परंतु तात्पुरत्या पर्यायाशिवाय कायम शिक्षक काही शाळांना मिळाले नाहीत. भोकरदन तालुक्यातील पालकांनी तर चक्क बेमुदत उपोषण सुरू केले होते; परंतु मुलांच्या आग्रहास्तव हे उपोषण मागे घेण्यात आले. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला जिल्ह्यातील १८३ सेवानिवृत्त शिक्षकांनी प्रतिसाद देत शिक्षण विभागाकडे अर्ज केले आहेत.

६२५ पदे रिक्तजिल्ह्यात शिक्षकांची एकूण ६२५ पदे रिक्त आहेत. त्यात मराठी माध्यमाची ५६७ तर उर्दू माध्यमाच्या ५८ जागा रिक्त आहेत. ६२५ शिक्षक नसल्याने अनेक शाळांवरील कामकाजाचे नियोजन कोलमडले असून, त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे.

१८९ शिक्षकांची बदली, आले केवळ १२२- जिल्ह्यातील १८९ शिक्षकांची बदली झाली आहे. त्यात मराठी माध्यमाचे १८१ तर उर्दू माध्यमाच्या ८ शिक्षकांची बदली झाली आहे. जिल्ह्यातून १८९ शिक्षक इतर जिल्ह्यात गेले आहेत. इतर जिल्ह्यातून येणारे सर्व शिक्षक मात्र आलेले नाहीत.- जिल्ह्यात केवळ १२२ शिक्षक हजर झाले आहेत. त्यात मराठी माध्यमाचे १२२ आणि उर्दू माध्यमाचे ६ शिक्षक आले आहेत. अद्यापही मराठी माध्यमाचे ४८ आणि उर्दू माध्यमाच्या एका शिक्षकाची प्रतीक्षा शिक्षण विभागाला आहे.

नियुक्तीची प्रक्रिया निर्देशानुसार करू !शासन निर्देशानुसार सेवानिवृत्त शिक्षकांनी कंत्राटी तत्त्वावर रुजू होऊन मुलांना ज्ञानदान करावे, असे आवाहन करण्यात आले होते. आजवर १८३ सेवानिवृत्त शिक्षकांचे अर्ज आले आहेत. या शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया शासन निर्देशानुसार केली जाणार आहे.- कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी

शाळा अन् विद्यार्थी संख्यातालुका शाळा- विद्यार्थीअंबड- २११- २३१०४बदनापूर- १५८- १३८९२भोकरदन- ३०५- २८१५१घनसावंगी- १७३- १९७०७जाफराबाद- १४८- १३९५०जालना- २२८- २१३७१मंठा- १४९ - १२४६६परतूर- १३०- १४६४६

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकJalanaजालना