शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 01:21 IST

जिल्हाभरातील २ लाख ३७ हजार शेतक-यांनी २ हजार ४०९ कोटी रूपयांचे कर्ज घेतलेले आहे. त्यापैकी दीड लाख शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले सन्मान कर्जमाफी योजनेनुसार दोन लाख रूपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याचे जाहीर केले होते, तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील २ लाख ३७ हजार शेतक-यांनी २ हजार ४०९ कोटी रूपयांचे कर्ज घेतलेले आहे. त्यापैकी दीड लाख शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. त्यामध्ये दीड लाखापर्यंतच्या कर्जाला सशर्त सक्ती दिली होती. त्यामध्ये अल्पमुदत पीककर्ज व मध्यम मुदतीच्या कर्जाला माफी मिळाली होती. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात दोन लाखांच्या वरती कर्ज असलेल्या शेतकºयांचे कर्जमाफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या शेतक-यांनाही कर्जमाफीची प्रतीक्षा लागून आहे.जिल्हाभरात २ लाख ३७ हजार शेतक-यांनी २ हजार ४०९ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले आहे. यातील जवळपास दीड लाख शेतक-यांचे कर्ज हे २ लाखाच्या आत असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे दीड लाख शेतक-यांना महात्मा जोतीराव फुले सन्मान कर्जमाफी योजनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.दरवर्षी खरीप आणि रबी हंगामात बियाणे, खत, पेरणी, शेतीची मशागत करण्यासाठी अर्थिक मदत म्हणून शेतक-यांना पीक कर्जाचा आधार असतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पीककर्ज घेण्याचे प्रमाणही वाढत आहे. पीककर्ज न फेडल्यामुळे तेचे व्याजही वाढत आहे.आढावा : याद्या तयार करण्याचे काम सुरूशेतकरी लागवडीसाठी दरवर्षी विविध बँकांकडून कर्ज घेतात. या पीककर्जातून शेतकरी पिकांवर औषध फवारणी, खत टाकणे इ. कामे करतात. २०१६-१७ यावर्षात जिल्हाभरातील १ लाख ८८ हजार १५२ शेतक-यांना १ हजार ४०० कोटींचे कर्ज देण्यात आले होते.२०१७-१८ मध्ये १ लाख २३ हजार ६३८ शेतक-यांना ४१३ कोटींचे पीककर्जाचे वाटप करण्यात आले. २०१८-१९ मध्ये १ लाख ६२ हजार ३७५ शेतक-यांना १ हजार ९६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने सांगण्यात आले.अद्याप संंभ्रमशासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात पीक कर्ज असा उल्लेख आहे. मात्र, अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदत यापैकी कोणाला कर्जमाफीचा लाभ मिळणार, याबाबत बँकांना स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. केवळ पीक कर्जाचा उल्लेख असल्यामुळे अल्पमुदतीचे पीककर्जच माफ होणार असल्याचे सरकारी व बँकांना सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी