शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दहा दिवसांत ६०० कोटी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 23:57 IST

महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत मागील १३ दिवसांत ९९ हजार ९२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत मागील १३ दिवसांत ९९ हजार ९२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे, तर आधार प्रमाणीकरण केलेल्या ८८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर गत दहा दिवसांत तब्बल ६१५ कोटी रुपये जमा झाले आहेत.महाआघाडी शासनाने कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर प्रारंभी जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतक-यांना १२०० कोटी रूपयांचे कर्ज माफ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. शेतक-यांच्या कर्ज खात्याशी आधार प्रमाणिकरण केल्यानंतर शासकीय वेबसाईटवर १ लाख ८१ हजार ५६७ शेतक-यांची नावे अपलोड करण्यात आली. २४ फेब्रुवारी रोजी प्राथमिक यादी जाहीर झाली. यात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ कर्जखात्यांचा समावेश होता. तर २९ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या दुस-या यादीत जिल्ह्यातील ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांच्या नावाचा समावेश होता. याद्यांच्या प्रसिध्दीकरणानंतर आजवर ९९ हजार ९२६ शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर तब्बल ८८ हजारावर शेतक-यांच्या कर्जखात्यात ६१५ कोटी रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. यात राष्ट्रीयकृत ७४ हजार ४५९ कर्जखात्यावर ५८१ कोटी तर जिल्हा बँकेच्या जवळपास १४ हजार कर्जखात्यांवर जवळपास ३४ कोटी रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतक-यांची रक्कमही जमा केली जाणार आहे.जिल्ह्यातून १५०० तक्रारीशासनाच्या कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरणाबाबत १५०० जणांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. यात आधार क्रमांक चुकीचा असणे, ठसे न उमटणे, मयत शेतक-यांचे वारस आदी तक्रारींचा समावेश आहे.मयतांच्या वारसांनी माहिती देण्याची गरजज्या शेतक-यांचे निधन झाले आहे आणि त्यांचे नाव कर्जमुक्ती यादीत आहे, अशा मयत शेतक-यांच्या वारसांनी संबंधित बँक अधिकारी किंवा तहसीलदारांकडे माहिती देण्याची गरज आहे. त्यानंतर बँक प्रशासनाकडून शासनाच्या पोर्टलवर माहिती भरेल. माहिती भरल्यानंतर त्या कर्जखात्याला कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया शासनस्तरावरून करण्यात येणार आहे.४० हजार खात्यांचे प्रमाणीकरण शिल्लकशासनाच्या दोन याद्यांमधील शेतक-यांपैकी ९९ हजार ९२६ शेतकºयांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर जवळपास ३० हजार शेतक-यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणिकरण शिल्लक आहे.संबंधित शेतक-यांनी हे आधार प्रमाणिकरण वेळेत करून घ्यावे. बाहेरगावी असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या परिसरात असलेल्यांना आपलं सरकार केंद्रावरूनही आधार प्रमाणिकरण करता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी