शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत ६०० कोटी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 23:57 IST

महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत मागील १३ दिवसांत ९९ हजार ९२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत मागील १३ दिवसांत ९९ हजार ९२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे, तर आधार प्रमाणीकरण केलेल्या ८८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर गत दहा दिवसांत तब्बल ६१५ कोटी रुपये जमा झाले आहेत.महाआघाडी शासनाने कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर प्रारंभी जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतक-यांना १२०० कोटी रूपयांचे कर्ज माफ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. शेतक-यांच्या कर्ज खात्याशी आधार प्रमाणिकरण केल्यानंतर शासकीय वेबसाईटवर १ लाख ८१ हजार ५६७ शेतक-यांची नावे अपलोड करण्यात आली. २४ फेब्रुवारी रोजी प्राथमिक यादी जाहीर झाली. यात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ कर्जखात्यांचा समावेश होता. तर २९ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या दुस-या यादीत जिल्ह्यातील ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांच्या नावाचा समावेश होता. याद्यांच्या प्रसिध्दीकरणानंतर आजवर ९९ हजार ९२६ शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर तब्बल ८८ हजारावर शेतक-यांच्या कर्जखात्यात ६१५ कोटी रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. यात राष्ट्रीयकृत ७४ हजार ४५९ कर्जखात्यावर ५८१ कोटी तर जिल्हा बँकेच्या जवळपास १४ हजार कर्जखात्यांवर जवळपास ३४ कोटी रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतक-यांची रक्कमही जमा केली जाणार आहे.जिल्ह्यातून १५०० तक्रारीशासनाच्या कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरणाबाबत १५०० जणांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. यात आधार क्रमांक चुकीचा असणे, ठसे न उमटणे, मयत शेतक-यांचे वारस आदी तक्रारींचा समावेश आहे.मयतांच्या वारसांनी माहिती देण्याची गरजज्या शेतक-यांचे निधन झाले आहे आणि त्यांचे नाव कर्जमुक्ती यादीत आहे, अशा मयत शेतक-यांच्या वारसांनी संबंधित बँक अधिकारी किंवा तहसीलदारांकडे माहिती देण्याची गरज आहे. त्यानंतर बँक प्रशासनाकडून शासनाच्या पोर्टलवर माहिती भरेल. माहिती भरल्यानंतर त्या कर्जखात्याला कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया शासनस्तरावरून करण्यात येणार आहे.४० हजार खात्यांचे प्रमाणीकरण शिल्लकशासनाच्या दोन याद्यांमधील शेतक-यांपैकी ९९ हजार ९२६ शेतकºयांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर जवळपास ३० हजार शेतक-यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणिकरण शिल्लक आहे.संबंधित शेतक-यांनी हे आधार प्रमाणिकरण वेळेत करून घ्यावे. बाहेरगावी असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या परिसरात असलेल्यांना आपलं सरकार केंद्रावरूनही आधार प्रमाणिकरण करता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी