शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत ६०० कोटी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 23:57 IST

महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत मागील १३ दिवसांत ९९ हजार ९२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत मागील १३ दिवसांत ९९ हजार ९२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे, तर आधार प्रमाणीकरण केलेल्या ८८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर गत दहा दिवसांत तब्बल ६१५ कोटी रुपये जमा झाले आहेत.महाआघाडी शासनाने कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर प्रारंभी जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतक-यांना १२०० कोटी रूपयांचे कर्ज माफ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. शेतक-यांच्या कर्ज खात्याशी आधार प्रमाणिकरण केल्यानंतर शासकीय वेबसाईटवर १ लाख ८१ हजार ५६७ शेतक-यांची नावे अपलोड करण्यात आली. २४ फेब्रुवारी रोजी प्राथमिक यादी जाहीर झाली. यात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ कर्जखात्यांचा समावेश होता. तर २९ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या दुस-या यादीत जिल्ह्यातील ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांच्या नावाचा समावेश होता. याद्यांच्या प्रसिध्दीकरणानंतर आजवर ९९ हजार ९२६ शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर तब्बल ८८ हजारावर शेतक-यांच्या कर्जखात्यात ६१५ कोटी रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. यात राष्ट्रीयकृत ७४ हजार ४५९ कर्जखात्यावर ५८१ कोटी तर जिल्हा बँकेच्या जवळपास १४ हजार कर्जखात्यांवर जवळपास ३४ कोटी रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतक-यांची रक्कमही जमा केली जाणार आहे.जिल्ह्यातून १५०० तक्रारीशासनाच्या कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरणाबाबत १५०० जणांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. यात आधार क्रमांक चुकीचा असणे, ठसे न उमटणे, मयत शेतक-यांचे वारस आदी तक्रारींचा समावेश आहे.मयतांच्या वारसांनी माहिती देण्याची गरजज्या शेतक-यांचे निधन झाले आहे आणि त्यांचे नाव कर्जमुक्ती यादीत आहे, अशा मयत शेतक-यांच्या वारसांनी संबंधित बँक अधिकारी किंवा तहसीलदारांकडे माहिती देण्याची गरज आहे. त्यानंतर बँक प्रशासनाकडून शासनाच्या पोर्टलवर माहिती भरेल. माहिती भरल्यानंतर त्या कर्जखात्याला कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया शासनस्तरावरून करण्यात येणार आहे.४० हजार खात्यांचे प्रमाणीकरण शिल्लकशासनाच्या दोन याद्यांमधील शेतक-यांपैकी ९९ हजार ९२६ शेतकºयांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर जवळपास ३० हजार शेतक-यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणिकरण शिल्लक आहे.संबंधित शेतक-यांनी हे आधार प्रमाणिकरण वेळेत करून घ्यावे. बाहेरगावी असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या परिसरात असलेल्यांना आपलं सरकार केंद्रावरूनही आधार प्रमाणिकरण करता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी