शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

होय, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचाच हात

By admin | Updated: June 8, 2016 04:41 IST

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, असे जाहीर मत प्रथमच चीनने व्यक्त केले

हाँगकाँग : मुंबईत २६ नोव्हेंबर २00८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला अतिरेकी घोषित करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना संयुक्त राष्ट्र संघात खोडा घालणाऱ्या चीनची भूमिका आता बदलताना दिसत आहे. कारण, मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, असे जाहीर मत प्रथमच चीनने व्यक्त केले आहे. चीनच्या या नव्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, चीनने उघडपणे अशी भूमिका का घेतली असावी, याची चर्चा पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये लगेचच सुरू झाली आहे. मुंबईवर पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी केलेल्या या भयंकर हल्ल्यात १६४ जण ठार झाले होते, तर ३०८ जण जखमी झाले होते. चीनमधील टेलिव्हिजन सीसीटीव्ही ९ ने काही दिवसांपूर्वीच एक डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती. मुंबई हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाची काय भूमिका होती, याबाबत त्यात माहिती दिली आहे. अमेरिकेसह अनेक देश पाकमधील दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे व त्यांना तेथील लष्कर तसेच आयएसआय या गुप्तचर संघटनेची असलेली मदत याबद्दल उघडपणे टीका करीत असताना चीनने मात्र कायमच पाकच्या बाजूने भूमिका घेतली आहे.

>चीनने दाखविले हल्ल्याचे फूटेज

मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता याला पुष्टी देणारी काही दृश्ये चीनच्या एका टेलिव्हिजनने दाखविली आहेत. यात अजमल कसाब दिसत असून, या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबाला जबाबदार ठरविले आहे. गत महिन्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे चीन दौऱ्यावर गेले होते. याच दरम्यान येथील शांघाई टेलिव्हिजनने ही माहिती प्रसारित केली होती. लष्कर-ए-तोयबाने मुंबई हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणी कशा प्रकारे केली हे यात दाखविण्यात आले आहे. शिनजियांंगमधील मुस्लीमबहुल भागात इस्लामिक मूव्हमेंटच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानात दुर्गम भागात प्रशिक्षण घेतले होते.

>वेट अ‍ॅण्ड वॉचचीच भूमिका 

ही चित्रफीत पाहिलेल्या एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाला किती महत्त्व आहे ते आम्ही पाहत आहोत. सध्या वेट अ‍ॅण्ड वॉचचीच भूमिका या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. जकी उर रहमान लखवी याच्यावर बंदी आणण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघात जेव्हा प्रयत्न केले तेव्हा चीनने त्याला विरोध केला होता, पठाणकोट हल्ल्यातील आरोपी मसूद अझहर याच्यावर कारवाईसाठी भारताने केलेल्या प्रयत्नालाही चीनने खोडा घातला होता.