शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

होय, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचाच हात

By admin | Updated: June 8, 2016 04:41 IST

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, असे जाहीर मत प्रथमच चीनने व्यक्त केले

हाँगकाँग : मुंबईत २६ नोव्हेंबर २00८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला अतिरेकी घोषित करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना संयुक्त राष्ट्र संघात खोडा घालणाऱ्या चीनची भूमिका आता बदलताना दिसत आहे. कारण, मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, असे जाहीर मत प्रथमच चीनने व्यक्त केले आहे. चीनच्या या नव्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, चीनने उघडपणे अशी भूमिका का घेतली असावी, याची चर्चा पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये लगेचच सुरू झाली आहे. मुंबईवर पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी केलेल्या या भयंकर हल्ल्यात १६४ जण ठार झाले होते, तर ३०८ जण जखमी झाले होते. चीनमधील टेलिव्हिजन सीसीटीव्ही ९ ने काही दिवसांपूर्वीच एक डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती. मुंबई हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाची काय भूमिका होती, याबाबत त्यात माहिती दिली आहे. अमेरिकेसह अनेक देश पाकमधील दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे व त्यांना तेथील लष्कर तसेच आयएसआय या गुप्तचर संघटनेची असलेली मदत याबद्दल उघडपणे टीका करीत असताना चीनने मात्र कायमच पाकच्या बाजूने भूमिका घेतली आहे.

>चीनने दाखविले हल्ल्याचे फूटेज

मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता याला पुष्टी देणारी काही दृश्ये चीनच्या एका टेलिव्हिजनने दाखविली आहेत. यात अजमल कसाब दिसत असून, या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबाला जबाबदार ठरविले आहे. गत महिन्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे चीन दौऱ्यावर गेले होते. याच दरम्यान येथील शांघाई टेलिव्हिजनने ही माहिती प्रसारित केली होती. लष्कर-ए-तोयबाने मुंबई हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणी कशा प्रकारे केली हे यात दाखविण्यात आले आहे. शिनजियांंगमधील मुस्लीमबहुल भागात इस्लामिक मूव्हमेंटच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानात दुर्गम भागात प्रशिक्षण घेतले होते.

>वेट अ‍ॅण्ड वॉचचीच भूमिका 

ही चित्रफीत पाहिलेल्या एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाला किती महत्त्व आहे ते आम्ही पाहत आहोत. सध्या वेट अ‍ॅण्ड वॉचचीच भूमिका या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. जकी उर रहमान लखवी याच्यावर बंदी आणण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघात जेव्हा प्रयत्न केले तेव्हा चीनने त्याला विरोध केला होता, पठाणकोट हल्ल्यातील आरोपी मसूद अझहर याच्यावर कारवाईसाठी भारताने केलेल्या प्रयत्नालाही चीनने खोडा घातला होता.