शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मनातले लिहा अन् कागद फाडा! रागावर नियंत्रण ठेवण्याचा अनोखा मार्ग संशोधकांनी शोधला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 05:30 IST

राग हा आगीपेक्षा मोठा मानला जातो. आगीवर नियंत्रण मिळवता येते, पण, रागावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी सोपे नसते.

टोकियो : राग हा आगीपेक्षा मोठा मानला जातो. आगीवर नियंत्रण मिळवता येते, पण, रागावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी सोपे नसते. जपानी मानसशास्त्रज्ञांनी रागावर नियंत्रण ठेवण्याचा अनोखा मार्ग शोधल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, इतरांवर रागाविण्याऐवजी त्यावेळच्या भावना कागदावर लिहून कागद फाडला तर राग नाहीसा होतो.

सायंटिफिक रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाचे प्रमुख लेखक नोबुयुकी कवाई यांनी सांगितले की, भावनांना लिहून काढणे आणि नंतर तो कागद फाडून टाकल्यामुळे रागावर नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे. आमच्या प्रयोगात काही प्रमाणात राग कमी होईल अशी अपेक्षा होती. पण, राग पूर्णपणे कमी झाल्याचे पाहून आम्हालाही आश्चर्य वाटले. आमच्या शोधाचा उपयोग रागाच्या उपचारात होऊ शकतो. घर किंवा ऑफिसमध्ये रागावर नियंत्रण ठेवल्यास वैयक्तिक जीवनात अन् नोकरीतील नकारात्मकता कमी होऊ शकते, असे संशोधकांनी सांगितले.

१०० विद्यार्थ्यांवर प्रयोग१०० विद्यार्थ्यांचा प्रयोगात समावेश करण्यात आला. त्यांना २ गटात विभागले गेले आणि सामाजिक विषयांवर मते लिहिण्यास सांगितले. विद्यापीठातील एका पीएच.डी.च्या विद्यार्थ्याने त्याच्या लेखी मताचे मूल्यमापन करताना अत्यंत कमी गुण दिले. तसेच ‘मला विश्वास बसत नाही की एखादा शिक्षित माणूस असा विचार करू शकतो’, अशा नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे विद्यार्थी संतापले होते.

...अन् ते रागावत राहिलेविद्यार्थ्यांच्या एका गटाने आपल्या भावना कागदावर लिहून त्याचे तुकडे करून फेकून दिले. या गटाचा राग पूर्णपणे शांत झाला होता. दुसऱ्या गटाने आपल्या भावना लिहून पेपर तसाच ठेवला. त्यांच्यामध्ये कमालीची नाराजी कायम होती. मूल्यांकनकर्त्याचा त्यांना सतत राग येत होता, असे दिसून आले.

टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइल