शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

मनातले लिहा अन् कागद फाडा! रागावर नियंत्रण ठेवण्याचा अनोखा मार्ग संशोधकांनी शोधला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 05:30 IST

राग हा आगीपेक्षा मोठा मानला जातो. आगीवर नियंत्रण मिळवता येते, पण, रागावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी सोपे नसते.

टोकियो : राग हा आगीपेक्षा मोठा मानला जातो. आगीवर नियंत्रण मिळवता येते, पण, रागावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी सोपे नसते. जपानी मानसशास्त्रज्ञांनी रागावर नियंत्रण ठेवण्याचा अनोखा मार्ग शोधल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, इतरांवर रागाविण्याऐवजी त्यावेळच्या भावना कागदावर लिहून कागद फाडला तर राग नाहीसा होतो.

सायंटिफिक रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाचे प्रमुख लेखक नोबुयुकी कवाई यांनी सांगितले की, भावनांना लिहून काढणे आणि नंतर तो कागद फाडून टाकल्यामुळे रागावर नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे. आमच्या प्रयोगात काही प्रमाणात राग कमी होईल अशी अपेक्षा होती. पण, राग पूर्णपणे कमी झाल्याचे पाहून आम्हालाही आश्चर्य वाटले. आमच्या शोधाचा उपयोग रागाच्या उपचारात होऊ शकतो. घर किंवा ऑफिसमध्ये रागावर नियंत्रण ठेवल्यास वैयक्तिक जीवनात अन् नोकरीतील नकारात्मकता कमी होऊ शकते, असे संशोधकांनी सांगितले.

१०० विद्यार्थ्यांवर प्रयोग१०० विद्यार्थ्यांचा प्रयोगात समावेश करण्यात आला. त्यांना २ गटात विभागले गेले आणि सामाजिक विषयांवर मते लिहिण्यास सांगितले. विद्यापीठातील एका पीएच.डी.च्या विद्यार्थ्याने त्याच्या लेखी मताचे मूल्यमापन करताना अत्यंत कमी गुण दिले. तसेच ‘मला विश्वास बसत नाही की एखादा शिक्षित माणूस असा विचार करू शकतो’, अशा नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे विद्यार्थी संतापले होते.

...अन् ते रागावत राहिलेविद्यार्थ्यांच्या एका गटाने आपल्या भावना कागदावर लिहून त्याचे तुकडे करून फेकून दिले. या गटाचा राग पूर्णपणे शांत झाला होता. दुसऱ्या गटाने आपल्या भावना लिहून पेपर तसाच ठेवला. त्यांच्यामध्ये कमालीची नाराजी कायम होती. मूल्यांकनकर्त्याचा त्यांना सतत राग येत होता, असे दिसून आले.

टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइल