शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

'नोबेल' विजेत्या मलाला हिला वाटतेय काश्मीरमधील महिलांची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 12:18 IST

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतला असून काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच काश्मीरमध्ये इंटरनेट आणि दुरसंचार सेवा बंद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - मुलींच्या शिक्षणासाठी आपलं सबंध आयुष्य अर्पण करणाऱ्या नोबल पारितोषिक विजेत्या मलाला युसूफझाई हिने काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर भीती व्यक्त केली. काश्मीर कलम ३७० अंतर्गत देण्यात आलेला विशेष दर्जा भारत सरकारने हटविला आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये तणापूर्ण शांतता आहे. यावर मलाला हिने काश्मीरमधील लहान मुलांची आणि महिलांची काळजी वाटत म्हटले आहे. या संदर्भात मलालाने ट्विटवर पोस्ट शेअर केली आहे.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतला असून काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच काश्मीरमध्ये इंटरनेट आणि दुरसंचार सेवा बंद करण्यात आली आहे.

मलालाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, माझे आई-वडिल लहान होते तेव्हापासून काश्मीरमधील लोक संघर्षमय जीवन जगत आहेत. दक्षिण आशियाला मी माझं घर समजते, त्यामुळे काश्मीरविषयी मला विशेष काळजी वाटते. एकमेकांना अडचणीत टाकण्याची आपल्याला काहीही आवश्यकता नाही. परंतु, सध्याच्या परिस्थितीत काश्मीरमधील लहान मुलं आणि महिलांची काळजी वाटत आहे. काश्मीरमधील स्थिती अत्यंत तणापूर्ण असून संघर्ष झाल्यास अनेकांचे नुकसान होऊ शकते, असंही मलालाने नमूद केले.