शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आता बस्स झालं! वारंवार चुकीचा नकाशा दाखवतंय WHO; भारताने तिसऱ्यांदा दिली ताकीद

By मोरेश्वर येरम | Updated: January 14, 2021 14:53 IST

WHO ला पत्र लिहीण्याची भारताची ही तिसरी वेळ आहे.

ठळक मुद्देWHO कडून भारताचा चुकीचा नकाशा वारंवार दाखविण्यात येतोयभारताच्या तक्रारीनंतरही WHO कडून कोणतीही सुधारणा नाहीWHO आणि चीनमध्ये साटंलोटं असल्याचा केला जातोय आरोप

नवी दिल्लीजागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) भारताचा चुकीचा नकाशा वापरला जात आहे. भारताने यावर आक्षेप घेत 'डब्ल्यूएचओ'चे प्रमुख टेड्रोस घेब्रेसस यांना कडक शब्दांत चूक सुधारण्याबाबतची ताकीद दिली आहे.भारताच्या चुकीच्या नकाशा तातडीने मागे घेऊन योग्य नकाशा वापरण्यात यावा, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने डब्ल्यूएचओला लिहिलेल्या पत्रात नमूद केल्याची माहिती हिंदूस्तान टाइम्सने प्रकाशित केली आहे. 

विशेष म्हणजे, WHO च्या या चूकीसाठी डिसेंबर महिन्यातही भारताने पत्र लिहीलं होतं. WHO ला पत्र लिहीण्याची भारताची ही तिसरी वेळ आहे. गेल्याच आठवड्यात संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधी असलेल्या इंद्रमणी पांड्ये यांनीही डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनाही चुकीच्या नकाशाबाबतची माहिती दिली होती. 

डब्ल्यूएचओच्या संकेतस्थळावर, व्हिडिओ आणि नकाशांमध्ये भारताच्या सीमांची माहिती चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे, असं भारताने याआधीच स्पष्ट सांगितलं आहे. आता ८ जानेवारी रोजी इंद्रमणी पांड्ये यांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, "डब्ल्यूएचओच्या विविध संकेतस्थळ आणि व्हिडिओंमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याबद्दल आम्ही जाहीर नाराजी व्यक्त करत आहोत. यासंदर्भात याआधी पाठवलेल्या पत्रांचीही पुन्हा आठवण करु देऊ इच्छितो की ज्यात चुकीच्या नकाशाबाबतची तक्रार आम्ही दिली होती. डब्ल्यूएचओचे प्रमुख म्हणून आपण यात तातडीने लक्ष घालून चूक सुधारण्यात यावी.

WHO च्या नकाशात चुकीचं काय?डब्ल्यूएचओने प्रकाशित केलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख हे प्रदेश वेगळ्या रंगात दाखविण्यात आले आहेत. यासोबतच पाकिस्तानने १९६३ साली चुकीच्या पद्धतीने चीनच्या हवाली केलेलं ५,१६९ किमी अंतरावर पसलेलं शक्सगाम खोरं देखील या नकाशात चीनचा भाग म्हणून दाखविण्यात आलं आहे. १९५४ साली चीनने जो अक्साई चीन प्रदेशावर कब्जा केला होता. त्या प्रदेशाला डब्ल्यूएचओने निळ्या रंगाच्या पट्ट्यांनी दाखवलं आहे. याच रंगात डब्ल्यूएचओने चीनचा नकाशा दाखवला आहे. 

महत्वाची बाब म्हणजे, भारतीय कायद्यांनुसार देशाचा चुकीचा नकाशा दाखवणं हा गुन्हा आहे. यासाठी सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. 'डब्ल्यूएचओ'च्या कोविड-१९ ट्रॅकरचा संपूर्ण जगभरात वापर करण्यात येतो. याच ट्रॅकरमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवणं हे अतिशय दुर्दैवी असल्याचं मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे. 'डब्ल्यूएचओ' आणि चीन यांच्या साटंलोटं असल्याचे आरोप याआधीपासून जागतिक राजकारणात करण्यात आले आहेत. अशात 'डब्ल्यूएचओ'नं भारताचा चुकीचा नकाशा दाखवणं हे देखील शंका निर्माण करणारं आहे.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतchinaचीन