शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

"जेव्हा दहशतवाद्यांनी माझ्याकडे पाहिले..."; राहुल गांधींनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 10:04 IST

जेव्हा मी भारत जोडो यात्रा करत होतो. तेव्हा काश्मीरमध्ये तुम्हाला धोका आहे असं म्हटलं गेले.

लंडन - सुरक्षा रक्षकांनी मला काश्मीरमध्ये पदयात्रा न काढण्याचा सल्ला दिला होता तरी मी भारत जोडो यात्रेत पदयात्रा काढली. त्यावेळी माझा सामना दहशतवाद्यांशी झाला होता असा दावा राहुल गांधींनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून केंब्रिज इथं ते संबोधित होते. 

राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मी भारत जोडो यात्रा करत होतो. तेव्हा काश्मीरमध्ये तुम्हाला धोका आहे असं म्हटलं गेले. तरीही आम्ही यात्रा सुरू केली. तेव्हा एक व्यक्ती माझ्याकडे आला त्याला माझ्याशी बोलायचं होते. सुरक्षारक्षकांनी तुम्ही असं करू नका. लोकांना जवळ बोलावू नका म्हटलं. तरीही मी त्या व्यक्तीला जवळ बोलावले. तो माझ्याजवळ आला. या व्यक्तीने विचारलं, खरेच तुम्ही आमची समस्या सोडवणार आहात का? मी म्हटलं, हो..आम्ही पुढे जात होतो तेव्हा या व्यक्तीने हात दाखवत तुम्ही ते पाहा असं सांगितले. 

राहुल गांधींनी विचारले. कुठे? त्या व्यक्तीने सांगितले तिकडे...ते दहशतवादी आहेत असं त्या व्यक्तीने म्हटलं. दहशतवाद्यांनी मला मारायला हवं होतं. त्या परिस्थितीत ते माझ्याकडे बघत होते आणि मी त्यांच्याकडे पाहत होतो. मी अडचणीत आहे असं मला वाटले. आम्ही एकमेकांना पाहत राहतो. काहीच घडत नाही मग आम्ही पुढे निघून गेलो असं राहुल गांधींनी म्हटलं. 

असं का घडलं?राहुल गांधींनी पुढे सांगितले असं का घडलं? त्यांच्याकडे काहीच न करण्यासाठी पॉवर नव्हती असं नाही. तर मी त्यांना ऐकण्यासाठी गेलो होतो. मी कुठलीही हिंसा करायला गेलो नव्हतो. अनेकजण हे पाहत होते म्हणून झाले. मीडिया आणि न्यायसंस्था यावर कब्जा केला आहे. दलित, अल्पसंख्याकांवर आदिवासींवर हल्ले होत आहेत. कुणी टीका केली तर त्याला धमकावलं जाते असा आरोप राहुल गांधींना केला. त्याचसोबत जेव्हा मी काश्मीरला गेलो होतो तेव्हा सुरक्षा रक्षक मला भेटले. आम्हाला तुमच्याशी बोलाचंय असं त्यांनी सांगितले. मी काश्मीरमध्ये यात्रा करू शकत नाही असं त्यांनी सांगितले. तुमच्यावर ग्रेनेड हल्ला होऊ शकतो. परंतु मला माझ्या पक्षातील लोकांशी बोलू द्या. मी भारत जोडो यात्रा पूर्ण करणार असा निर्धार राहुल गांधींनी सुरक्षा रक्षकांसमोर बोलून दाखवला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस