शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"जेव्हा दहशतवाद्यांनी माझ्याकडे पाहिले..."; राहुल गांधींनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 10:04 IST

जेव्हा मी भारत जोडो यात्रा करत होतो. तेव्हा काश्मीरमध्ये तुम्हाला धोका आहे असं म्हटलं गेले.

लंडन - सुरक्षा रक्षकांनी मला काश्मीरमध्ये पदयात्रा न काढण्याचा सल्ला दिला होता तरी मी भारत जोडो यात्रेत पदयात्रा काढली. त्यावेळी माझा सामना दहशतवाद्यांशी झाला होता असा दावा राहुल गांधींनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून केंब्रिज इथं ते संबोधित होते. 

राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मी भारत जोडो यात्रा करत होतो. तेव्हा काश्मीरमध्ये तुम्हाला धोका आहे असं म्हटलं गेले. तरीही आम्ही यात्रा सुरू केली. तेव्हा एक व्यक्ती माझ्याकडे आला त्याला माझ्याशी बोलायचं होते. सुरक्षारक्षकांनी तुम्ही असं करू नका. लोकांना जवळ बोलावू नका म्हटलं. तरीही मी त्या व्यक्तीला जवळ बोलावले. तो माझ्याजवळ आला. या व्यक्तीने विचारलं, खरेच तुम्ही आमची समस्या सोडवणार आहात का? मी म्हटलं, हो..आम्ही पुढे जात होतो तेव्हा या व्यक्तीने हात दाखवत तुम्ही ते पाहा असं सांगितले. 

राहुल गांधींनी विचारले. कुठे? त्या व्यक्तीने सांगितले तिकडे...ते दहशतवादी आहेत असं त्या व्यक्तीने म्हटलं. दहशतवाद्यांनी मला मारायला हवं होतं. त्या परिस्थितीत ते माझ्याकडे बघत होते आणि मी त्यांच्याकडे पाहत होतो. मी अडचणीत आहे असं मला वाटले. आम्ही एकमेकांना पाहत राहतो. काहीच घडत नाही मग आम्ही पुढे निघून गेलो असं राहुल गांधींनी म्हटलं. 

असं का घडलं?राहुल गांधींनी पुढे सांगितले असं का घडलं? त्यांच्याकडे काहीच न करण्यासाठी पॉवर नव्हती असं नाही. तर मी त्यांना ऐकण्यासाठी गेलो होतो. मी कुठलीही हिंसा करायला गेलो नव्हतो. अनेकजण हे पाहत होते म्हणून झाले. मीडिया आणि न्यायसंस्था यावर कब्जा केला आहे. दलित, अल्पसंख्याकांवर आदिवासींवर हल्ले होत आहेत. कुणी टीका केली तर त्याला धमकावलं जाते असा आरोप राहुल गांधींना केला. त्याचसोबत जेव्हा मी काश्मीरला गेलो होतो तेव्हा सुरक्षा रक्षक मला भेटले. आम्हाला तुमच्याशी बोलाचंय असं त्यांनी सांगितले. मी काश्मीरमध्ये यात्रा करू शकत नाही असं त्यांनी सांगितले. तुमच्यावर ग्रेनेड हल्ला होऊ शकतो. परंतु मला माझ्या पक्षातील लोकांशी बोलू द्या. मी भारत जोडो यात्रा पूर्ण करणार असा निर्धार राहुल गांधींनी सुरक्षा रक्षकांसमोर बोलून दाखवला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस