शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 07:35 IST

पाकिस्तानने या बैठकीची विनंती केली होती जेणेकरून दक्षिण आशियात निर्माण होणारा संघर्ष टाळता येईल. 

नवी दिल्ली - भारतपाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत संभाव्यपणे दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाली. त्यानंतर यूएनमध्ये एक पत्रकार परिषद घेत पाकिस्तानी दूत असीम इफ्तिखार यांनी यूनएससीच्या बैठकीत जे पाहिजे होते, ते मिळाले असं विधान केले. या बैठकीत पाकिस्तानने जम्मू काश्मीर वाद सोडवण्यावरही चर्चा झाल्याची माहिती दिली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या सैन्य कारवाईच्या भीतीने पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याची मागणी केली. या बैठकीत सुरक्षा परिषदेने भारताला संयम बाळगण्याचा सल्ला द्यावा असा प्रयत्न पाकिस्तानचा होता. ही बैठक UNSC च्या चेंबरमध्ये नाही तर कंसल्टेशन रुममध्ये आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानने या बैठकीची विनंती केली होती जेणेकरून दक्षिण आशियात निर्माण होणारा संघर्ष टाळता येईल. 

जम्मू काश्मीरवरही बैठकीत चर्चा

पाकिस्तानी दूत असीम इफ्तिखार यांनी म्हटलं की, या बैठकीत संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अनेक सदस्यांनी काश्मीरच्या लोकांच्या इच्छेनुसार जम्मू काश्मीर वादासह इतर सर्व मुद्दे शांततेने सोडवण्याच्या प्रयत्नांना मान्यता दिली. प्रादेशिक शांतता एकतर्फी होऊ शकत नाही त्यासाठी राजनैतिक, संवाद आणि जागतिक कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे हेदेखील मान्य झाल्याचे सांगितले. भारत पाकिस्तान मुद्द्यावर यूएनएससीच्या बैठकीवर कौन्सिलकडून अद्याप काही अपडेट आले नाहीत. परंतु पाकच्या मीडियाने असीम इफ्तिखारच्या हवाल्याने म्हटलंय की, आम्ही भारताच्या अलीकडच्या एकतर्फी पावलांबाबत, विशेषत: २३ एप्रिलनंतर अवैध कारवाई, सैन्य कारवाई आणि चिथावणीखोर विधानांवर चिंता व्यक्त केली आहे असं सांगण्यात आले.

शहबाज शरीफ यांनी दोनदा यूएन चीफशी केली चर्चा

२२ एप्रिल पहलगाम हल्ल्यानंतर २३ एप्रिलला भारताने ५ घोषणा केल्या. ज्यात सिंधु जल कराराला स्थगिती देण्यात आली. या निर्णयामुळे पाकिस्तानात पाण्याची मोठी समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. त्यातून पाकिस्तानला आर्थिक नुकसान होईल. त्याशिवाय शहबाज शरीफ सरकारने यूएनकडे हस्तक्षेप करण्याचं आवाहन केले आहे. भारताच्या कठोर इशाऱ्यानंतर शहबाज शरीफ दोनदा यूएन प्रमुखांशी बोलले आहेत. सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वीही त्यांनी प्रमुख एंटोनिया गुटेरेस यांच्याशी फोनवरून संवाद साधला. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला आर्थिक नुकसान होण्याचा मार्ग पत्करला आहे असं त्यांनी गुटेरेस यांना म्हटलं.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ