शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 07:35 IST

पाकिस्तानने या बैठकीची विनंती केली होती जेणेकरून दक्षिण आशियात निर्माण होणारा संघर्ष टाळता येईल. 

नवी दिल्ली - भारतपाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत संभाव्यपणे दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाली. त्यानंतर यूएनमध्ये एक पत्रकार परिषद घेत पाकिस्तानी दूत असीम इफ्तिखार यांनी यूनएससीच्या बैठकीत जे पाहिजे होते, ते मिळाले असं विधान केले. या बैठकीत पाकिस्तानने जम्मू काश्मीर वाद सोडवण्यावरही चर्चा झाल्याची माहिती दिली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या सैन्य कारवाईच्या भीतीने पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याची मागणी केली. या बैठकीत सुरक्षा परिषदेने भारताला संयम बाळगण्याचा सल्ला द्यावा असा प्रयत्न पाकिस्तानचा होता. ही बैठक UNSC च्या चेंबरमध्ये नाही तर कंसल्टेशन रुममध्ये आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानने या बैठकीची विनंती केली होती जेणेकरून दक्षिण आशियात निर्माण होणारा संघर्ष टाळता येईल. 

जम्मू काश्मीरवरही बैठकीत चर्चा

पाकिस्तानी दूत असीम इफ्तिखार यांनी म्हटलं की, या बैठकीत संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अनेक सदस्यांनी काश्मीरच्या लोकांच्या इच्छेनुसार जम्मू काश्मीर वादासह इतर सर्व मुद्दे शांततेने सोडवण्याच्या प्रयत्नांना मान्यता दिली. प्रादेशिक शांतता एकतर्फी होऊ शकत नाही त्यासाठी राजनैतिक, संवाद आणि जागतिक कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे हेदेखील मान्य झाल्याचे सांगितले. भारत पाकिस्तान मुद्द्यावर यूएनएससीच्या बैठकीवर कौन्सिलकडून अद्याप काही अपडेट आले नाहीत. परंतु पाकच्या मीडियाने असीम इफ्तिखारच्या हवाल्याने म्हटलंय की, आम्ही भारताच्या अलीकडच्या एकतर्फी पावलांबाबत, विशेषत: २३ एप्रिलनंतर अवैध कारवाई, सैन्य कारवाई आणि चिथावणीखोर विधानांवर चिंता व्यक्त केली आहे असं सांगण्यात आले.

शहबाज शरीफ यांनी दोनदा यूएन चीफशी केली चर्चा

२२ एप्रिल पहलगाम हल्ल्यानंतर २३ एप्रिलला भारताने ५ घोषणा केल्या. ज्यात सिंधु जल कराराला स्थगिती देण्यात आली. या निर्णयामुळे पाकिस्तानात पाण्याची मोठी समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. त्यातून पाकिस्तानला आर्थिक नुकसान होईल. त्याशिवाय शहबाज शरीफ सरकारने यूएनकडे हस्तक्षेप करण्याचं आवाहन केले आहे. भारताच्या कठोर इशाऱ्यानंतर शहबाज शरीफ दोनदा यूएन प्रमुखांशी बोलले आहेत. सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वीही त्यांनी प्रमुख एंटोनिया गुटेरेस यांच्याशी फोनवरून संवाद साधला. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला आर्थिक नुकसान होण्याचा मार्ग पत्करला आहे असं त्यांनी गुटेरेस यांना म्हटलं.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ