शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

नेपाळमध्ये ५ वर्षातून एकदा भरते गढीमाई जत्रा, लाखो जनावरांचा दिला जातो बळी; काय आहे प्रथा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:28 IST

Gadhimai Festival : १५ दिवस चाललेल्या या जत्रेत यावेळी ८ आणि ९ डिसेंबर या दोन दिवसांत ४२०० म्हशींचा बळी देण्यात आला.

Gadhimai Festival :  नेपाळमधील बारा जिल्ह्यातील गढीमाई देवी याठिकाणी दर पाच वर्षांनी एकदा जत्रा भरते. या जत्रेत अडीच लाख ते पाच लाख जनावरांचा बळी दिला जातो. मात्र, यंदाच्या यात्रेत सशस्त्र सीमा दल व स्थानिक प्रशासनाने जनावरांना वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, १५ दिवस चाललेल्या या जत्रेत यावेळी ८ आणि ९ डिसेंबर या दोन दिवसांत ४२०० म्हशींचा बळी देण्यात आला. तर दुसरीकडे, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे म्हैस, मेंढ्या, शेळ्या व इतर जनावरांचा समावेश असलेल्या ७५० जनावरांना वाचवण्यात यश आले आहे. या प्राण्यांना भारतात गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स ग्रुपच्या वन्यजीव पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.

बारा जिल्ह्यातील गढीमाई शहरात असलेल्या प्रसिद्ध गढीमाई मंदिरात दर पाच वर्षांनी आयोजित करण्यात येणाऱ्या जत्रेचे उद्घाटन २ डिसेंबर रोजी नेपाळचे उपराष्ट्रपती राम सहाय यादव यांच्या हस्ते करण्यात आले. ही जत्रा १५ डिसेंबरपर्यंत चालली. ८ डिसेंबर रोजी एक विशेष पूजा झाली आणि त्यानंतर ज्या लोकांचा नवस पूर्ण झाला, त्यांनी आपल्या नवसानुसार पशु-पक्ष्यांचा बळी दिला.

पारंपरिक मान्यतेनुसार, गढीमाई मंदिराचे संस्थापक भगवान चौधरी यांना स्वप्न पडले की होते, तुरुंगातून मुक्त होण्यासाठी माता बलिदान मागत आहे. यानंतर पुजाऱ्याने जनावराचा बळी दिला. तेव्हापासून लोक आपल्या इच्छेने येथे येतात आणि जनावरांचा बळी देतात. गढीमाईचा हा उत्सव २६५ वर्षांपासून होत असल्याचे सांगितले जाते. 

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये पशुबळी बंद करण्याचे आदेश दिले होते. जाणकारांचे म्हणणे आहे की, लोक गढीमाईच्या मंदिरात नैवेद्य देतात, जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होते. जगातील सर्वात जास्त यज्ञ याच मंदिरात होतात. बळी देण्यासाठी बहुतेक प्राणी खरेदी केले जातात. सर्वात मोठा सामूहिक यज्ञ विधी म्हणून गढीमाई जत्रेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.

प्रथेविरोधात आवाज उठवला जातोयनेपाळशिवाय भूतान, बांगलादेश आणि भारतासह अनेक देशांतून अनेक भाविक या जत्रेला भेट देतात. जगातील अनेक देशांमध्ये याा बळीच्या प्रथेविरोधात आवाज उठवला जात आहे. भारतातही या प्रथेविरोधात आवाज उठवला जात आहे. हे प्रकरण नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले आहे. २०१९ मध्ये, न्यायालयाने पशू बलिदानावर तात्काळ बंदी घालण्यास नकार दिला होता, परंतु आदेशात म्हटले होते की, गढीमाई जत्रेदरम्यान पशुबलिदान हळूहळू कमी केले जावे. मात्र, हे धार्मिक श्रद्धेशी निगडीत आहे, त्यामुळे याच्याशी संबंधित लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले होते.

टॅग्स :NepalनेपाळInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत