शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

नेपाळमध्ये ५ वर्षातून एकदा भरते गढीमाई जत्रा, लाखो जनावरांचा दिला जातो बळी; काय आहे प्रथा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:28 IST

Gadhimai Festival : १५ दिवस चाललेल्या या जत्रेत यावेळी ८ आणि ९ डिसेंबर या दोन दिवसांत ४२०० म्हशींचा बळी देण्यात आला.

Gadhimai Festival :  नेपाळमधील बारा जिल्ह्यातील गढीमाई देवी याठिकाणी दर पाच वर्षांनी एकदा जत्रा भरते. या जत्रेत अडीच लाख ते पाच लाख जनावरांचा बळी दिला जातो. मात्र, यंदाच्या यात्रेत सशस्त्र सीमा दल व स्थानिक प्रशासनाने जनावरांना वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, १५ दिवस चाललेल्या या जत्रेत यावेळी ८ आणि ९ डिसेंबर या दोन दिवसांत ४२०० म्हशींचा बळी देण्यात आला. तर दुसरीकडे, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे म्हैस, मेंढ्या, शेळ्या व इतर जनावरांचा समावेश असलेल्या ७५० जनावरांना वाचवण्यात यश आले आहे. या प्राण्यांना भारतात गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स ग्रुपच्या वन्यजीव पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.

बारा जिल्ह्यातील गढीमाई शहरात असलेल्या प्रसिद्ध गढीमाई मंदिरात दर पाच वर्षांनी आयोजित करण्यात येणाऱ्या जत्रेचे उद्घाटन २ डिसेंबर रोजी नेपाळचे उपराष्ट्रपती राम सहाय यादव यांच्या हस्ते करण्यात आले. ही जत्रा १५ डिसेंबरपर्यंत चालली. ८ डिसेंबर रोजी एक विशेष पूजा झाली आणि त्यानंतर ज्या लोकांचा नवस पूर्ण झाला, त्यांनी आपल्या नवसानुसार पशु-पक्ष्यांचा बळी दिला.

पारंपरिक मान्यतेनुसार, गढीमाई मंदिराचे संस्थापक भगवान चौधरी यांना स्वप्न पडले की होते, तुरुंगातून मुक्त होण्यासाठी माता बलिदान मागत आहे. यानंतर पुजाऱ्याने जनावराचा बळी दिला. तेव्हापासून लोक आपल्या इच्छेने येथे येतात आणि जनावरांचा बळी देतात. गढीमाईचा हा उत्सव २६५ वर्षांपासून होत असल्याचे सांगितले जाते. 

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये पशुबळी बंद करण्याचे आदेश दिले होते. जाणकारांचे म्हणणे आहे की, लोक गढीमाईच्या मंदिरात नैवेद्य देतात, जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होते. जगातील सर्वात जास्त यज्ञ याच मंदिरात होतात. बळी देण्यासाठी बहुतेक प्राणी खरेदी केले जातात. सर्वात मोठा सामूहिक यज्ञ विधी म्हणून गढीमाई जत्रेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.

प्रथेविरोधात आवाज उठवला जातोयनेपाळशिवाय भूतान, बांगलादेश आणि भारतासह अनेक देशांतून अनेक भाविक या जत्रेला भेट देतात. जगातील अनेक देशांमध्ये याा बळीच्या प्रथेविरोधात आवाज उठवला जात आहे. भारतातही या प्रथेविरोधात आवाज उठवला जात आहे. हे प्रकरण नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले आहे. २०१९ मध्ये, न्यायालयाने पशू बलिदानावर तात्काळ बंदी घालण्यास नकार दिला होता, परंतु आदेशात म्हटले होते की, गढीमाई जत्रेदरम्यान पशुबलिदान हळूहळू कमी केले जावे. मात्र, हे धार्मिक श्रद्धेशी निगडीत आहे, त्यामुळे याच्याशी संबंधित लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले होते.

टॅग्स :NepalनेपाळInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत