शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

अवकाशातला कचरा माणसासाठीही धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 04:09 IST

शास्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीभोवती सात हजार ६०० टन अवकाश कचरा

पृथ्वीप्रमाणेच कचऱ्याची समस्या आता अवकाशातही जाणवू लागली आहे. अवकाशात पृथ्वीभोवती इतका कचरा वाढू लागला आहे की, त्यासाठी मोहीम सुरू करावी लागली आहे. शास्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीभोवती सात हजार ६०० टन अवकाश कचरा आहे.या कचऱ्याचा धोका काय?समजा कचऱ्याचा छोटा तुकडा अवकाशात एखाद्या उपग्रहाला लागला तर त्या उपग्रहाचे हजारो तुकडे होऊ शकतात. एवढेच नाही तर त्या उपग्रहाची गती २५ हजार किलोमीटर प्रति तास एवढी वाढण्याचाही धोका आहे. या वेगाने अवकाशात फिरणारे उपग्रहाचे तुकडे इतरही उपग्रहांना धोकादायक ठरू शकतात. हे तुकडे मानव असलेल्या अवकाशयानाला धडकल्यास काय होईल, याचा विचारच न केलेला बरा.कचरा तयार कसा होतो?आता अवकाशात उपग्रह सोडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. खासगी कंपन्याही उपग्रह पाठवू लागल्या आहेत. उपग्रह अवकाशात पोहोचवण्यासाठी लागणारे रॉकेट्स आणि त्याचे भाग मग सहसा पृथ्वीवर परत येत नाहीत. ते पृथ्वीभोवतीच फिरत राहतात. त्यामुळे साहजिकच जितके जास्त रॉकेट अवकाशात जातील, तितका कचरा जास्त कचरा वाढत जाणार.वापरात नसलेल्या उपग्रहांचाही धोकाअवकाशात उपग्रह पाठवल्यानंतर तो सहसा १० ते १५ वर्षे काम करत असतो. त्यानंतर तो निकामी होतो. पण तो अवकाशातच फिरत राहतो. शिवाय काही उपग्रह अवकाशात गेल्यानंतर अयशस्वी होतात. त्यामुळे तेही फिरत असतातच. त्यामुळे जितके उपग्रह अवकाशात जातील, तितका धोका वाढत जाणार आहे.