शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

अवकाशातला कचरा माणसासाठीही धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 04:09 IST

शास्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीभोवती सात हजार ६०० टन अवकाश कचरा

पृथ्वीप्रमाणेच कचऱ्याची समस्या आता अवकाशातही जाणवू लागली आहे. अवकाशात पृथ्वीभोवती इतका कचरा वाढू लागला आहे की, त्यासाठी मोहीम सुरू करावी लागली आहे. शास्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीभोवती सात हजार ६०० टन अवकाश कचरा आहे.या कचऱ्याचा धोका काय?समजा कचऱ्याचा छोटा तुकडा अवकाशात एखाद्या उपग्रहाला लागला तर त्या उपग्रहाचे हजारो तुकडे होऊ शकतात. एवढेच नाही तर त्या उपग्रहाची गती २५ हजार किलोमीटर प्रति तास एवढी वाढण्याचाही धोका आहे. या वेगाने अवकाशात फिरणारे उपग्रहाचे तुकडे इतरही उपग्रहांना धोकादायक ठरू शकतात. हे तुकडे मानव असलेल्या अवकाशयानाला धडकल्यास काय होईल, याचा विचारच न केलेला बरा.कचरा तयार कसा होतो?आता अवकाशात उपग्रह सोडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. खासगी कंपन्याही उपग्रह पाठवू लागल्या आहेत. उपग्रह अवकाशात पोहोचवण्यासाठी लागणारे रॉकेट्स आणि त्याचे भाग मग सहसा पृथ्वीवर परत येत नाहीत. ते पृथ्वीभोवतीच फिरत राहतात. त्यामुळे साहजिकच जितके जास्त रॉकेट अवकाशात जातील, तितका कचरा जास्त कचरा वाढत जाणार.वापरात नसलेल्या उपग्रहांचाही धोकाअवकाशात उपग्रह पाठवल्यानंतर तो सहसा १० ते १५ वर्षे काम करत असतो. त्यानंतर तो निकामी होतो. पण तो अवकाशातच फिरत राहतो. शिवाय काही उपग्रह अवकाशात गेल्यानंतर अयशस्वी होतात. त्यामुळे तेही फिरत असतातच. त्यामुळे जितके उपग्रह अवकाशात जातील, तितका धोका वाढत जाणार आहे.