शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:26 IST

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये झालेल्या हल्ल्याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या कुटुंबाने याची माहिती दिली. जैशचा कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने एका रॅलीत म्हटले आहे की, ७ मे रोजी भारताने बहावलपूरवर हल्ला केला तेव्हा मसूद अझहरचे कुटुंब तुकड्यांमध्ये विभागले गेले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'राबवूनपाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाला ठार केल्याची माहिती समोर आली होती. याबाबत आता जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने माहिती दिली. त्याने मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याचे कबुल केले आहे. 

विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...

'७ मे रोजी भारताने बहावलपूरच्या दहशतवादी तळावर हल्ला केला तेव्हा दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचे तुकडे तुकडे केल्याचे जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने कबूल केले. तो म्हणाला की, या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला. कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले. 

भारताने १०० किलोमीटर पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला 

बहावलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक शहर आहे. येथे, जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय मरकझ सुभान अल्लाह नावाच्या ठिकाणी आहे. पाकिस्तानच्या आत १०० किलोमीटरवर असलेल्या ऑपरेशन सिंदूरचा हा सर्वात प्रमुख आणि प्राणघातक हल्ला होता. भारतीय सैन्याने ऑपरेशन अंतर्गत जैशच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचा हा संपूर्ण तळ उद्ध्वस्त झाला. दहशतवादी मसूद अझहरचे कुटुंब या जैश तळात राहत होते. सॅटेलाईट फोटोमधून भारताच्या हल्ल्यात मरकझ सुभान अल्लाह उध्वस्त झाल्याचे दिसत आहे. 

जैशच्या कार्यालयात भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचला

भारतीय लष्कराच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी जैशच्या तळावर हल्ला केल्याची माहिती दिली होती. भारताविरुद्ध अनेक हल्ले याच ठिकाणी रचल्याचे त्यांनी सांगितले. 

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईअंतर्गत भारताने पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. ७ ते १० मे पर्यंत चाललेल्या या कारवाईदरम्यान, भारताने केवळ पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत तर पाकिस्तानच्या नूर खान एअरबेस, रहीम खान एअरबेससह १०-१२ लष्करी तळही उद्ध्वस्त केले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर