शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

आम्हाला नोक-या देणारे तरुण तयार करायचे आहेत - नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 17:06 IST

आम्हाला भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवायचे असून, नोक-या देणारे तरुण तयार करायचे आहेत.

ठळक मुद्देडिजिटल व्यवहार मोठया प्रमाणात वाढले असून, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. भारतात परिवर्तन घडवण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत.

मनिला -  आम्हाला भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवायचे असून, नोक-या देणारे तरुण तयार करायचे आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी ’एशियान’ शिखर परिषदेत बोलताना सांगितले. भारतीय लोकसंख्येचा मोठा वर्ग बँक सुविधेपासून वंचित होता. जन धन योजनेमुळे ते चित्र बदलले. लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन झाले असे मोदींनी सांगितले. मिनिमम गर्व्हमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्सवर आमचा भर आहे. मागच्या तीन वर्षात कालबाहय झालेले 1200 कायदे रद्द केले. 

कंपनी सुरु करण्याची प्रक्रिया आम्ही अधिक सोपी केली. अनेक परवानग्याही सुलभतेने मिळतील याकडे लक्ष दिले असे मोदींनी सांगितले. डिजिटल व्यवहार मोठया प्रमाणात वाढले असून, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. भारतात परिवर्तन घडवण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत. सोपे, परिणामकारक आणि पारदर्शक प्रशासनासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहोत असे मोदींनी सांगितले.  

’एशियान’ शिखर संमेलानासाठी फिलिपिन्समध्ये आलेले पंतप्रधान नरेंद्र  मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यात आशियाई देशांचे भविष्य आणि अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिका  मिळून संपूर्ण जगाचे भविष्य बदलू शकतात, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच भारताच्या केलेल्या कौतुकासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. 

आशियाई शिखर परिषदेतील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गेल्या सहा महिन्यांमधील मोदी आणि ट्रम्प  यांच्यामधील ही दुसरी बैठक आहे. या बैठकीमधून ट्रम्प यांनी भारत हा अमेरिकेसाठी चीनपेक्षा कमी महत्त्वपूर्ण नसल्याचे दाखवून दिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने सुधारले आहेत. विशेषकरून  चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्युत्तर म्हणून भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांच्यातील युतीमधून त्याचे संकेत मिळत आहेत.