शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

काश्मीर मुद्द्यांवर आम्ही पाकिस्तानसोबत; भारताच्या 'या' निर्णयावर भडकलं अझरबैजान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 10:55 IST

अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी यापूर्वी २०२० मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता.

नवी दिल्ली - आर्मेनियाच्या मुद्द्यावरून भारताचे अझरबैजानसोबतचे संबंध सातत्याने बिघडत आहेत. अझरबैजानचे भारतातील माजी राजदूत अश्रफ शिकालीव यांनी काश्मीरवर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. अझरबैजानने काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानशी सहकार्याची भूमिका कायम ठेवली आहे असं राजदूताने एका मुलाखतीत म्हटले आहे. 

गेल्या ३० वर्षांत अझरबैजानची काश्मीरबाबतची भूमिका बदललेली नाही, ती अजिबात बदललेली नाही असं अझरबैजानचे राजदूत म्हणाले, जे नोव्हेंबरपर्यंत भारतात अझरबैजानचे राजदूत म्हणून काम करत होते. भारत आणि पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचा आदर करून हा प्रश्न शांततेने सोडवावा. ही आमची भूमिका आहे. गेल्या तीन दशकात यात कोणताही बदल झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी यापूर्वी २०२० मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, २१ जानेवारी २०२० रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या भेटीदरम्यान अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव म्हणाले की अझरबैजान जम्मू आणि काश्मीर मुद्द्यांवर पाकिस्तानला नेहमी पाठिंबा देईल.

आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये अनेक दशकांपासून युद्ध 

अर्मेनिया आणि अझरबैजान अनेक दशकांपासून नागोर्नो-काराबाखवर नियंत्रण मिळवण्यासाठी लढा देत आहेत. २०२० मध्ये या प्रदेशावरील शत्रुत्वाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले आणि दोन्ही देशांचे सैन्य रणांगणात उतरले. अझरबैजानने आर्मेनियावर लढाई जिंकली आणि २०२३ मध्ये नागोर्नो-काराबाख पूर्णपणे ताब्यात घेतला.

अर्मेनियाने भारतासोबत केलेल्या शस्त्राच्या डीलवर भडकले अझरबैजानचे राष्ट्रपती

काही महिन्यांपूर्वी आर्मेनियाने भारत आणि फ्रान्ससोबत शस्त्रास्त्रांचा मोठा करार केला होता. या करारात हवाई संरक्षण यंत्रणा, चिलखती वाहने आणि इतर शस्त्रे खरेदीचा समावेश आहे. अझरबैजानचे राष्ट्रापती इल्हाम अलीयेव या करारावर संतापले होते. आगीत पेट्रोल टाकण्याचं काम भारत आणि फ्रान्स एकत्र काम करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. ते म्हणाले होते, भारत आणि फ्रान्ससारखे देश आर्मेनियाला शस्त्रे पुरवून आग आणखी भडकतवत आहेत. हे देश अर्मेनियामध्ये असा भ्रम निर्माण करत आहेत की या शस्त्रांच्या मदतीने ते काराबाख परत घेऊ शकतात.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर