शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आम्ही ओलिस ठेवलेल्या २१४ सैनिकांना ठार केलं; BLAच्या दाव्याने पाकिस्तानात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:34 IST

सरकारने बलूच कैद्यांची सुटका न केल्याने आम्ही सैनिकांची हत्या केल्याचा दावा बीएलएने केला आहे.

Pakistan Attack: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) ओलिस ठेवलेल्या २१४ सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे. चार दिवसांपूर्वी बीएलएने ट्रेन हायजॅक करत सैनिकांना ओलिस ठेवलं होतं. पाकिस्तान सरकारने ४८ तासांत बलूच कैद्यांची सुटका केली नाही, तर या सर्व लोकांनाही मारले जाईल, असा इशारा बीएलएकडून देण्यात आला होता. या सैन्यांच्या हत्येचा दावा आता बीएलएकडून करण्यात आल्याने पाकमध्ये खळबळ उडाली आहे. 

बलूच लिबरेशन आर्मीने ओलिस ठेवलेल्या सर्व सैनिकांची आम्ही सुटका केली आहे, असा दावा पाकस्तानी लष्कराकडून करण्यात आला होता. परंतु बीएलएने हा दावा खोडून काढत सरकारने बलूच कैद्यांची सुटका न केल्याने आम्ही सैनिकांची हत्या केल्याचा दावा बीएलएने केला आहे.

पाकिस्तानात नेमकं काय घडतंय?

बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळं करण्याची मागणी करणाऱ्या बीएलएने मंगळवारी एका ट्रेनचं अपहरण करत ४० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्यानंतर बुधवारी ६० पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा केला होता. आतापर्यंत शेकडो पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

हल्लेखोरांची संख्या किती?

अपहरण झालेल्या ट्रेनमधील एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, अतिरेक्यांनी वृद्ध, नागरिक, महिला व बालकांना जाऊ दिले. प्रवासी घाबरलेले होते. अंदाजानुसार ते २५० लोकांना बरोबर गेऊन गेले. हल्लेखोरांची संख्या १,१०० होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानrailwayरेल्वेBlastस्फोट