शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:07 IST

Bilawal Bhuttoo India Pakistan News: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पुन्हा एकदा सिंधू जल करारावरून भारतावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत भुत्तोंनी युद्धाची भाषा केली आहे. 

India Pakistan News: 'सिंधू आमची आहे, आमचीच राहणार. सिंधू नदीतून आमचे पाहणी वाहिले नाही, तर भारतीयांचे रक्त वाहणार', असे विधान करणारे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पुन्हा एकदा युद्धाची भाषा करत गरळ ओकली आहे. पंतप्रधान मोदींनी आता सिंधूवर हल्ला केला आहे, असे भुत्तो म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या मिरपूरखास येथे बिलावल भुत्तो यांची सभा झाली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा सिंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीका केली. 

मोदींनी सिंधू नदीवर हल्ला केलाय  बिलावल भुत्तो एका सभेत बोलताना म्हणाले, "आम्हाला युद्ध नकोय, पण ते जर सिंधूवर हल्ला करत असतील, तर त्यांना माहिती आहे की, सिंधूतून पाणी वाहणार किंवा रक्त. पंतप्रधान मोदींनी आता सिंधूवर हल्ला केला आहे. आणि आवाहन करतो की, आपण ज्या प्रकारे देशात सिंधूच्या पाण्याबद्दल उठवतो. त्याचप्रमाणे आपण आता एकजूट होऊयात. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत."

वाचा >>...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ

"आपण सिंधू मोदींच्या धोक्यापासून दूर बाहेर काढू. मी २७ डिसेंबर रोजी म्हटलं होतं की, मी जेव्हा तुमचा मंत्री होतो, तेव्हापासून सिंधूची बाजू मांडत आलोय. मी याच सिंधू जल कराराचा उल्लेख करत होतो. तेव्हाही भारताने प्रयत्न केले आणि आज काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी घोषणा केली आहे की, ते सिंधू जल करार मान्य करत नाही. आम्ही त्यांचा हा निर्णयच मान्य करत नाही", असे बिलावल भुत्तो म्हणाले.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर