शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:07 IST

Bilawal Bhuttoo India Pakistan News: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पुन्हा एकदा सिंधू जल करारावरून भारतावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत भुत्तोंनी युद्धाची भाषा केली आहे. 

India Pakistan News: 'सिंधू आमची आहे, आमचीच राहणार. सिंधू नदीतून आमचे पाहणी वाहिले नाही, तर भारतीयांचे रक्त वाहणार', असे विधान करणारे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पुन्हा एकदा युद्धाची भाषा करत गरळ ओकली आहे. पंतप्रधान मोदींनी आता सिंधूवर हल्ला केला आहे, असे भुत्तो म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या मिरपूरखास येथे बिलावल भुत्तो यांची सभा झाली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा सिंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीका केली. 

मोदींनी सिंधू नदीवर हल्ला केलाय  बिलावल भुत्तो एका सभेत बोलताना म्हणाले, "आम्हाला युद्ध नकोय, पण ते जर सिंधूवर हल्ला करत असतील, तर त्यांना माहिती आहे की, सिंधूतून पाणी वाहणार किंवा रक्त. पंतप्रधान मोदींनी आता सिंधूवर हल्ला केला आहे. आणि आवाहन करतो की, आपण ज्या प्रकारे देशात सिंधूच्या पाण्याबद्दल उठवतो. त्याचप्रमाणे आपण आता एकजूट होऊयात. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत."

वाचा >>...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ

"आपण सिंधू मोदींच्या धोक्यापासून दूर बाहेर काढू. मी २७ डिसेंबर रोजी म्हटलं होतं की, मी जेव्हा तुमचा मंत्री होतो, तेव्हापासून सिंधूची बाजू मांडत आलोय. मी याच सिंधू जल कराराचा उल्लेख करत होतो. तेव्हाही भारताने प्रयत्न केले आणि आज काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी घोषणा केली आहे की, ते सिंधू जल करार मान्य करत नाही. आम्ही त्यांचा हा निर्णयच मान्य करत नाही", असे बिलावल भुत्तो म्हणाले.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर