शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

भारताबरोबर युद्ध आम्हाला परवडले नसते! चीनच्या मेजर जनरलने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 15:39 IST

डोकलाम संघर्षात भारताबरोबर कोणतीही तडजोड न करता थेट युद्धाचे पाऊल उचलायला हवे होते अशी भूमिका मांडणा-या चिनी विचारवंतांना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मेजर जनरलने फटकारले आहे.

ठळक मुद्देचीनचे रणनितीक धोरण आखणीमध्ये कियाओ यांची महत्वाची भूमिका असते.यापूर्वी ग्लोबल टाइम्समधून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात होती.

नवी दिल्ली, दि. 14 - डोकलाम संघर्षात भारताबरोबर कोणतीही तडजोड न करता थेट युद्धाचे पाऊल उचलायला हवे होते अशी भूमिका मांडणा-या चिनी विचारवंतांना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मेजर जनरलने फटकारले आहे. भारता विरोधात मतप्रदर्शन करणा-यांना चीनचे नेमके रणनितीक स्थान काय आहे याची अजिबात कल्पना नाही. चीन आणि भारत दोन्ही देश शेजारी आणि स्पर्धक आहेत. प्रत्येक स्पर्धकाला आपण कठोरपणे वागवू शकत नाही असे मेजर जनरल  कियाओ लियांग यांनी ग्लोबल टाइम्समध्ये लिहीलेल्या लेखात म्हटले आहे. 

चीनचे रणनितीक धोरण आखणीमध्ये कियाओ यांची महत्वाची भूमिका असते. प्रथमच चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिका-याने अशी भूमिका मांडली आहे. यापूर्वी ग्लोबल टाइम्समधून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात होती. भारताला धडा शिकवू, सोडणार नाही असे लेख लिहीले जात होते. डोकलाममध्ये 73 दिवस सुरु असलेला हा संघर्ष मागच्या महिन्यात मिटला. त्यानंतर आता चीनची भूमिका सौम्य होत चालली आहे. 

नाथू ला खिंडीचा रस्ता पुन्हा सुरु करण्यासाठी चीन आता चर्चा करण्यास तयार आहे. हा मार्ग कैलास मानसरोवरला जातो. जिथे दरवर्षी मोठया संख्येने भारतीय भाविक जातात. डोकलाम संघर्ष सुरु झाल्यानंतर हा मार्ग बंद झाला होता. डोकलाम मुद्यावर भारताबरोबर तडजोड करताना चीन सरकारवर दबाव होता. चीनमध्ये अनेकांना हा निर्णय पटला नव्हता. भारताला धडा शिकवायला हवा होता असे अनेकांचे मत होते. डोकलामचा तिढा ज्या पद्धतीने सुटायला हवा होता त्याच प्रकारे या मुद्यावर समाधान निघाले. युद्ध टाळणे गरजेचे होते असे प्रथमच चिनी लष्करातील वरिष्ठ अधिका-याने म्हटले आहे. 

भविष्यात डोकलामसारखा संघर्ष उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारताला रणनितीक मार्गदर्शन करणा-या सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने भारताला लष्करी क्षमता वाढवण्याचा सल्ला दिला आहे.वादग्रस्त सीमा आणि नियंत्रण रेषेवर शांतता रहावी यासाठी भारताने आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले पाहिजे. कारण चीन ताकतीचा आदर करतो असे सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने म्हटले आहे. 

टॅग्स :Doklamडोकलाम