शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

भारताबरोबर युद्ध आम्हाला परवडले नसते! चीनच्या मेजर जनरलने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 15:39 IST

डोकलाम संघर्षात भारताबरोबर कोणतीही तडजोड न करता थेट युद्धाचे पाऊल उचलायला हवे होते अशी भूमिका मांडणा-या चिनी विचारवंतांना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मेजर जनरलने फटकारले आहे.

ठळक मुद्देचीनचे रणनितीक धोरण आखणीमध्ये कियाओ यांची महत्वाची भूमिका असते.यापूर्वी ग्लोबल टाइम्समधून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात होती.

नवी दिल्ली, दि. 14 - डोकलाम संघर्षात भारताबरोबर कोणतीही तडजोड न करता थेट युद्धाचे पाऊल उचलायला हवे होते अशी भूमिका मांडणा-या चिनी विचारवंतांना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मेजर जनरलने फटकारले आहे. भारता विरोधात मतप्रदर्शन करणा-यांना चीनचे नेमके रणनितीक स्थान काय आहे याची अजिबात कल्पना नाही. चीन आणि भारत दोन्ही देश शेजारी आणि स्पर्धक आहेत. प्रत्येक स्पर्धकाला आपण कठोरपणे वागवू शकत नाही असे मेजर जनरल  कियाओ लियांग यांनी ग्लोबल टाइम्समध्ये लिहीलेल्या लेखात म्हटले आहे. 

चीनचे रणनितीक धोरण आखणीमध्ये कियाओ यांची महत्वाची भूमिका असते. प्रथमच चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिका-याने अशी भूमिका मांडली आहे. यापूर्वी ग्लोबल टाइम्समधून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात होती. भारताला धडा शिकवू, सोडणार नाही असे लेख लिहीले जात होते. डोकलाममध्ये 73 दिवस सुरु असलेला हा संघर्ष मागच्या महिन्यात मिटला. त्यानंतर आता चीनची भूमिका सौम्य होत चालली आहे. 

नाथू ला खिंडीचा रस्ता पुन्हा सुरु करण्यासाठी चीन आता चर्चा करण्यास तयार आहे. हा मार्ग कैलास मानसरोवरला जातो. जिथे दरवर्षी मोठया संख्येने भारतीय भाविक जातात. डोकलाम संघर्ष सुरु झाल्यानंतर हा मार्ग बंद झाला होता. डोकलाम मुद्यावर भारताबरोबर तडजोड करताना चीन सरकारवर दबाव होता. चीनमध्ये अनेकांना हा निर्णय पटला नव्हता. भारताला धडा शिकवायला हवा होता असे अनेकांचे मत होते. डोकलामचा तिढा ज्या पद्धतीने सुटायला हवा होता त्याच प्रकारे या मुद्यावर समाधान निघाले. युद्ध टाळणे गरजेचे होते असे प्रथमच चिनी लष्करातील वरिष्ठ अधिका-याने म्हटले आहे. 

भविष्यात डोकलामसारखा संघर्ष उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारताला रणनितीक मार्गदर्शन करणा-या सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने भारताला लष्करी क्षमता वाढवण्याचा सल्ला दिला आहे.वादग्रस्त सीमा आणि नियंत्रण रेषेवर शांतता रहावी यासाठी भारताने आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले पाहिजे. कारण चीन ताकतीचा आदर करतो असे सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने म्हटले आहे. 

टॅग्स :Doklamडोकलाम