शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
2
IPL 2025: आता मी लहान मुलाप्रमाणे झोप घेईन... पहिली IPL ट्रॉफी अन् 'विराट' सुख
3
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
4
हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)
5
IPL 2025 : ऑरेंज-पर्पल कॅप GT कडे! MI च्या ताफ्यातील सूर्यालाही मिळाला मोठा पुरस्कार, इथं पाहा संपूर्ण यादी
6
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
7
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
8
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
9
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
10
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
11
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
12
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
13
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
14
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
15
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
16
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
17
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
18
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
19
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट

भारताशी पंगा घेणं पडतंय महागात! पाकिस्तानमध्ये पाण्यासाठी हाहाकार, पीक पेरणीवरही मोठा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:26 IST

Water Crisis In Pakistan : पाकिस्तान सध्या तीव्र पाणी संकटाचा सामना करत आहे. शेतीचा खरीप हंगाम सुरू असताना देशातील ...

Water Crisis In Pakistan :पाकिस्तान सध्या तीव्र पाणी संकटाचा सामना करत आहे. शेतीचा खरीप हंगाम सुरू असताना देशातील अनेक भागांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानसाठी ही परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. भारताने अलीकडेच सिंधू पाणी करार स्थगित केल्याने या संकटात अधिक भर पडली आहे.

भारताचा कडक इशाराजम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कठोर इशारा दिला. सीमापार दहशतवाद रोखण्यात अपयशी ठरल्याने भारताने सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही" असे ठाम विधान करत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

धरणांचे पाणी साठे अर्ध्यावरसिंधू नदी प्रणालीतील प्रमुख धरणांपैकी मंगला आणि तारबेला धरणांमधील पाण्याची पातळी गंभीर पातळीवर खाली आली आहे. इंडस रिव्हर सिस्टिम अथॉरिटीच्या (IRSA)  माहितीनुसार, मंगला धरणाची एकूण क्षमता ५.९ दशलक्ष एकर फूट (MAF) असून, सध्या फक्त २.७ एमएएफ पाणी शिल्लक आहे. तर, तारबेला धरणाची क्षमता ११.६ एमएएफ असून, त्यामध्ये केवळ ६ एमएएफ पाणी उरले आहे.

खरीप हंगाम धोक्यातपाण्याच्या टंचाईमुळे खरीप पिकांची पेरणी धोक्यात आली आहे. सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये सिंचन आणि वीज निर्मितीवर गंभीर परिणाम होत आहे. चिनाब नदीतून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातही भारताने केलेली कपात पाकिस्तानसाठी अडचणीची ठरत आहे.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानचा आक्रोशपाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाण्याच्या समस्येवर जागतिक पातळीवर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी अनेकदा भारतासोबत चर्चेची विनंती केली असली, तरी भारताने दहशतवाद आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर या मुद्द्यांवरच चर्चा होईल, हे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला