शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
3
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
4
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
5
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
6
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
7
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
8
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
9
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
10
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
11
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
12
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
13
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
14
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
15
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
16
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
17
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
18
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
19
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
20
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता

भारताशी पंगा घेणं पडतंय महागात! पाकिस्तानमध्ये पाण्यासाठी हाहाकार, पीक पेरणीवरही मोठा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:26 IST

Water Crisis In Pakistan : पाकिस्तान सध्या तीव्र पाणी संकटाचा सामना करत आहे. शेतीचा खरीप हंगाम सुरू असताना देशातील ...

Water Crisis In Pakistan :पाकिस्तान सध्या तीव्र पाणी संकटाचा सामना करत आहे. शेतीचा खरीप हंगाम सुरू असताना देशातील अनेक भागांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानसाठी ही परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. भारताने अलीकडेच सिंधू पाणी करार स्थगित केल्याने या संकटात अधिक भर पडली आहे.

भारताचा कडक इशाराजम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कठोर इशारा दिला. सीमापार दहशतवाद रोखण्यात अपयशी ठरल्याने भारताने सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही" असे ठाम विधान करत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

धरणांचे पाणी साठे अर्ध्यावरसिंधू नदी प्रणालीतील प्रमुख धरणांपैकी मंगला आणि तारबेला धरणांमधील पाण्याची पातळी गंभीर पातळीवर खाली आली आहे. इंडस रिव्हर सिस्टिम अथॉरिटीच्या (IRSA)  माहितीनुसार, मंगला धरणाची एकूण क्षमता ५.९ दशलक्ष एकर फूट (MAF) असून, सध्या फक्त २.७ एमएएफ पाणी शिल्लक आहे. तर, तारबेला धरणाची क्षमता ११.६ एमएएफ असून, त्यामध्ये केवळ ६ एमएएफ पाणी उरले आहे.

खरीप हंगाम धोक्यातपाण्याच्या टंचाईमुळे खरीप पिकांची पेरणी धोक्यात आली आहे. सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये सिंचन आणि वीज निर्मितीवर गंभीर परिणाम होत आहे. चिनाब नदीतून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातही भारताने केलेली कपात पाकिस्तानसाठी अडचणीची ठरत आहे.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानचा आक्रोशपाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाण्याच्या समस्येवर जागतिक पातळीवर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी अनेकदा भारतासोबत चर्चेची विनंती केली असली, तरी भारताने दहशतवाद आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर या मुद्द्यांवरच चर्चा होईल, हे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला