शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'द वॉशिंग्टन पोस्ट'नं घेतली 'मुंबई मराठा क्रांती मोर्चा'ची दखल

By harshada.shirsekar | Updated: August 11, 2017 13:44 IST

अमेरिकेतील प्रसिद्ध "द वॉशिंग्टन पोस्ट'' या वृत्तपत्राने 9 ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाची दखल घेतली आहे

वॉशिंग्टन, दि. 11 - अमेरिकेतील प्रसिद्ध "द वॉशिंग्टन पोस्ट'' या वृत्तपत्राने 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाची दखल घेतली आहे. आरक्षणासहीत अन्य मागण्यांसाठी मराठा समाजानं 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये काढलेला 58 वा मोर्चा ऐतिहासिक ठरला.  ऐतिहासिक व गर्दीचा विक्रम मोडित काढलेल्या या मराठा मोर्चा चर्चा केवळ राज्यातच नाही तर देशासहीत परदेशातही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर "द वॉशिंग्टन पोस्ट''लाही मराठ्यांच्या एल्गाराची दखल घ्यावी लागली.  मराठा समाजाला शासकीय नोक-या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, यासहीत अन्य मागण्यांसाठी मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईतील आझाद मैदानावर धडकले होते.  मराठा क्रांतीच्या या विजयी मोर्चाचे फोटोसहीत सविस्तर वृत्तांकन 'द वॉशिंग्टन पोस्ट'मध्ये छापण्यात आले आहे. 

''भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या दिवशी दक्षिण मुंबईतील शाळा व काही व्यवसायदेखील बंद ठेवण्यात आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चाच्या मार्गावरील वाहनांची रहदारी पर्यायी मार्गावर वळवण्यात आली होती'', याचादेखील उल्लेख करत 'द वॉशिंग्टन पोस्ट'नं आपल्या वाचकांसाठी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे वृत्त छापले आहे. विशेष म्हणजे 'द वॉशिंग्टन पोस्ट'नं छापलेल्या बातमीमध्ये अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणंही बातमीत मांडले आहे.  

कोपर्डी बलात्काराच्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ सुरुवातीला मराठ्यांनी हा मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर समाजातील अन्य मुद्यांकडेही लक्ष वेधण्यास सुरुवात झाली. दरम्यान, कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणानंतर या मोर्चाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की, आता त्याचे एक वादळच संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. 

Thousands march for quota in government jobs in India

MUMBAI, India - Tens of thousands of people waving saffron flags marched through Mumbai on Wednesday demanding quotas in government jobs and education for the underprivileged Maratha community in western India. The marchers covered a distance of more than five kilometers (3 miles) silently with no speeches or slogans raised.

मुंबईत मराठा क्रांती मोर्च्याचा एल्गारमहाराष्ट्राची राजधानी महामुंबईमध्ये सकल मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी क्रांतिदिनाच्या ( 9 ऑगस्ट ) पार्श्वभूमीवर महामोर्चा काढून ऐतिहासिक विजय नोंदवला. मराठा समाजामध्ये जी अस्वस्थता आहे तिचा स्फोटच एकप्रकारे आझाद मैदानावर पाहायला मिळाला. आरक्षणाची मागणी वगळता बहुतांश मागण्या सरकारला मान्य करण्यास या मोर्चाने भाग पाडले आहे. या मोर्चाच्या शिष्टमंडळाशी बोलल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या सभागृहात मराठा समाजाच्या मागण्या आणि सरकारची भूमिका मांडली. आरक्षणाविषयी ठोस भूमिका स्पष्ट केली नाही आणि ज्या शेतीवर बहुसंख्य मराठा समाज राबतो आहे, त्या शेतीतील दुखण्यावर कोणता उपाय करण्यात येणार आहे, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. या दोन बाबी सोडल्या तर उर्वरित मागण्यांवर सकारात्मक विचार झाला. काही निर्णयही झाले. म्हटलं तर हा मराठा क्रांती मोर्चाचा विजय आहे. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी एक माहिती दिली की, मराठा समाजाच्या समस्या आणि मागण्या यांचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसिमिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याची दर तीन महिन्यांतून बैठक होणार आहे. याचाच अर्थ या मागण्यांवर अजूनही चर्चा अपेक्षित आहे. कोपर्डी प्रकरण, आरक्षणाचा निर्णय, वसतिगृहांची उभारणी, शेतीविषयीचे निर्णय यावर सातत्याने दबाव निर्माण करावा लागणार आहे. त्यासाठी सकल मराठा समाजाला दबाव वाढवावाच लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केल्या घोषणा ?- छत्रपती शाहू महाराज योजनेंतर्गत ३५ अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करण्यात आली होती. आता ती ६०५ अभ्यासक्रमांसाठी लागू केली जाईल. किमान ६० टक्के गुण शिष्यवृत्तीसाठी अनिवार्य होते. आता ओबीसींप्रमाणे केवळ ५० टक्के गुणांचीच अट असेल.

- प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारले जाईल. प्रत्येक वसतिगृहासाठी ५ कोटींचे एकरकमी अनुदान.बार्टीच्या धर्तीवर मराठा समाजासंदर्भात संशोधन करून, योजना तयार करण्याच्या अनुषंगाने सारथी संस्था सुरू करून त्यांना पुण्यात कार्यालय देण्यात आले आहे. डॉ. सदानंद मोरे हे त्याचे अध्यक्ष आहेत. संस्थेचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.

- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला यापूर्वी राज्य सरकारने २०० कोटी निधी दिला होता. महामंडळामार्फत शेतकऱ्यांच्या ३ लाख मुलांना केंद्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेला केंद्र सरकारने कालच मंजुरी दिली आहे. प्रशिक्षित मुलांना रोजगार सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांचे कर्ज बँकेमार्फत देण्यात येईल व त्याचे व्याज सवलत योजनेतून महामंडळामार्फत भरण्यात येईल.

- मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा काही जातींना आरक्षण मिळाले आहे. मराठा आणि इतरही समाजातील या जाती आहेत. त्यांना त्या प्रवर्गात घेण्यात आले आहे, पण त्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येतात. अशा एकूण १८ जाती आढळल्या आहेत. त्यांना सुलभतेने जात प्रमाणपत्र मिळावे, याकरिता राज्य सरकार प्रयत्न करेल. रक्ताच्या नात्यामध्ये एका व्यक्तीची जातवैधता पडताळणी झाल्यानंतर, कुटुंबातील इतर सदस्याला पुन्हा जातपडताळणीसाठी जावे लागणार नाही, असा कायदा लवकरच राज्य शासन करेल.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा