शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 08:41 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूरवेळी अणुहल्ल्याच्या तयारीबाबत विधान केले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर दोन्ही देशात तणाव सुरू होता. त्यावेळी पाकिस्तान अणु हल्ल्याची तयारी करत होता अशी माहिती समोर आली होती. दरम्यान, यावर आता स्वत: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिली.  शनिवारी त्यांनी सांगितले की त्यांचा अणुकार्यक्रम शांततापूर्ण उपक्रमांसाठी आणि स्वसंरक्षणासाठी आहे.

इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शरीफ यांनी ही टिप्पणी केली. त्यांनी अलीकडेच भारतासोबत चार दिवस चाललेल्या लष्करी संघर्षाची आठवणही करून दिली. शरीफ म्हणाले की, भारतीय लष्करी हल्ल्यात ५५ पाकिस्तानी मारले गेले. 

पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद

अण्वस्त्रे वापरण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, शरीफ म्हणाले, "पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण हेतूंसाठी आणि राष्ट्रीय संरक्षणासाठी आहे, हल्ल्यासाठी नाही." २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६ मे रोजी उशिरा ऑपरेशन सिंदूर सुरू केले, यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले.

भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे प्रत्युत्तर दिले

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात ५ सशस्त्र दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची निर्घृण हत्या केली, त्यापैकी बहुतेक हिंदू पर्यटक होते. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 'द रेझिस्टन्स फ्रंट' ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांना लक्ष्य केले, यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली. भारताने पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. प्रत्युत्तर म्हणून, भारताने ६-७ मे २०२५ च्या रात्री 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, याचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विधवांच्या सन्मानार्थ ठेवले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले.या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर