शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 08:41 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूरवेळी अणुहल्ल्याच्या तयारीबाबत विधान केले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर दोन्ही देशात तणाव सुरू होता. त्यावेळी पाकिस्तान अणु हल्ल्याची तयारी करत होता अशी माहिती समोर आली होती. दरम्यान, यावर आता स्वत: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिली.  शनिवारी त्यांनी सांगितले की त्यांचा अणुकार्यक्रम शांततापूर्ण उपक्रमांसाठी आणि स्वसंरक्षणासाठी आहे.

इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शरीफ यांनी ही टिप्पणी केली. त्यांनी अलीकडेच भारतासोबत चार दिवस चाललेल्या लष्करी संघर्षाची आठवणही करून दिली. शरीफ म्हणाले की, भारतीय लष्करी हल्ल्यात ५५ पाकिस्तानी मारले गेले. 

पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद

अण्वस्त्रे वापरण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, शरीफ म्हणाले, "पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण हेतूंसाठी आणि राष्ट्रीय संरक्षणासाठी आहे, हल्ल्यासाठी नाही." २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६ मे रोजी उशिरा ऑपरेशन सिंदूर सुरू केले, यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले.

भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे प्रत्युत्तर दिले

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात ५ सशस्त्र दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची निर्घृण हत्या केली, त्यापैकी बहुतेक हिंदू पर्यटक होते. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 'द रेझिस्टन्स फ्रंट' ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांना लक्ष्य केले, यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली. भारताने पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. प्रत्युत्तर म्हणून, भारताने ६-७ मे २०२५ च्या रात्री 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, याचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विधवांच्या सन्मानार्थ ठेवले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले.या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर