शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जीवलग ‘मित्रा’ची भुतानला प्रतीक्षा

By admin | Updated: June 15, 2014 02:08 IST

पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या परदेशभेटीसाठी भुतानची निवड करून दक्षिण आशियाई राजकारणातल्या बदलाचे संकेत देणारे नरेंद्र मोदी आज थिम्पू येथे आपल्या परराष्ट्र धोरणाचा पाया घालतील

अपर्णा वेलणकर, थिम्पूभारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या परदेशभेटीसाठी भुतानची निवड करून दक्षिण आशियाई राजकारणातल्या बदलाचे संकेत देणारे नरेंद्र मोदी आज थिम्पू येथे आपल्या परराष्ट्र धोरणाचा पाया घालतील. एरव्हीचे पश्चिमधार्जिणे प्राधान्य बदलून शेजारी भारताच्या पंतप्रधानांनी सीमेपल्याडच्या आपल्या छोट्या मित्राच्या भेटीसाठी प्रथम यावे, याबद्दल भुतानमध्ये आश्चर्यमिश्रित स्वागताची भावना आहे.थिम्पूच्या दक्षिणेला वांगचू नदीच्या किनाऱ्यावरल्या ताशी झाँग नावाच्या भव्य पुरातन वास्तूमध्ये भुतानचे पंतप्रधान ल्योंचेन टोग्बे नरेंद्र मोदींचे स्वागत करतील. त्यानंतर, भुतानच्या राजानेही मोदींना खास भेटीसाठी निमंत्रित केले आहे. भारताला भुतानकडून विजेचा अखंड पुरवठा हवा आहे आणि विजेच्या निर्यातीतून मिळणारी भारतीय चलनाची गंगाजळी भुतानच्या डगमगत्या अर्थव्यवस्थेसाठी श्वासाहून महत्त्वाची आहे. याखेरीज, दोन देशांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाची उभारणी, डोंगराळ भागातील रस्तेबांधणीसाठीचे आधुनिक तंत्रज्ञान, इतर पायाभूत सुविधांची निर्मिती, व्यापार आणि गुंतवणूक हे कळीचे विषय दोन्ही देशांच्या कार्यक्रम पत्रिकेवर असतील. पर्यटक म्हणून फिरताना दिसणारे या हिरव्यागर्द देशाचे रूप जितके विलोभनीय आहे, तितकाच या देशाचा सामाजिक धागा गुंतागुंतीचा! एरव्ही, परदेशी भूमीवर आपल्या कवडीमोल रुपयामुळे खिसे हलके होण्याचा अनुभव असलेले भारतीय पर्यटक इथल्या दुकानदारांना असलेले भारतीय रुपयाचे अप्रूप पाहूनच खूश होतात. चहा-साखरेपासून थेट पेट्रोलपर्यंतच्या जवळपास सर्व जीवनावश्यक वस्तू भारतातून येतात आणि देशाच्या वार्षिक अर्थसंकल्पात भारतीय रुपयाच्या गंगाजळीत किती वाढ-घट झाली, याची चर्चा महत्त्वाची असते. भुतानमध्ये वापरले जाणारे जवळपास १०० टक्के पेट्रोल आणि डिझेल भारतातून निर्यात होते. या इंधनावरची सबसिडी अचानक रद्द करून संपुआ सरकारने गेल्याच वर्षी भुतानी अर्थव्यवस्थेचे प्राण कंठाशी आणले होते. काही महिन्यांतच मनमोहन सिंग सरकारने हा निर्णय मागे घेतला, पण दोन्ही देशांच्या परस्पर संबंधात या घटनेने कटुता आणली होती. नव्या राजवटीत भारताच्या नेतृत्वाची धुरा नरेंद्र मोदी यांच्यासारख्या ‘कडव्या नॅशनॅलिस्ट’ नेत्याच्या हाती गेल्यावर भुतानमध्ये शंकेचे मळभ दाट झाले होते, परंतु शपथविधी समारंभासाठी शेजारी राष्ट्रांना सन्मानाने आमंत्रित करण्याच्या ‘मास्टरस्ट्रोक’मुळे हे ढग दूर झाले.नरेंद्र मोदींच्या आजच्या भेटीतून भुतानला हवा आहे तो परस्पर संबंधांच्या सुरळीततेचा दिलासा आणि देशात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी गुंतवणुकीचे आश्वासन!