शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

आशियाई देशांनी जगाचे नेतृत्व करण्यासाठी आध्यात्मिक परंपरेचे निजधन वापरावे- राम नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 10:30 IST

जागतिक मंचावरचे आशियाई देशांचे वाढते महत्त्व लक्षात घेता जगाच्या भल्यासाठी आशियाई देशांनी आपल्याकडे असलेल्या वैचारिक मूल्ये व पर्यावरणीय संस्कृतीच्या संपदेचा सुयोग्य वापर करावा

म्यानमार, दि. 6 - जागतिक मंचावरचे आशियाई देशांचे वाढते महत्त्व लक्षात घेता जगाच्या भल्यासाठी आशियाई देशांनी आपल्याकडे असलेल्या वैचारिक मूल्ये व पर्यावरणीय संस्कृतीच्या संपदेचा सुयोग्य वापर करावा, असं उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक म्हणाले आहेत. राम नाईक यांनी म्यानमारची राजधानी यंगून येथे संवाद या आंतरराष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.दिल्लीतल्या विवेकानंद इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज व जपान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंगून येथे भरलेल्या दोन दिवसीय संमेलनात संघर्ष परिस्थिती टाळा व पर्यावरणीय चेतना या विषयावर भारत, म्यानमार, जपानसहीत अनेक देशांचे नेते, विद्वान व धर्मप्रसारक आपले विचार मांडणार आहे. गौतम बुद्धांनी स्वतःच स्वतःला मार्ग दाखवा असे म्हटले होते. उपनिषदांमध्येही तत्त्व व आत्मा हे सर्वोच्च चेतनेहून भिन्न असल्याचं प्रतिपादनही राम नाईक यांनी केले.राम नाईक म्हणाले, प्राचीन काळापासून म्यानमार व भारताचे सौहार्दाचे संबंध आहेत. ते अधिकाधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या प्रयत्नांना आज यश आलंय. समाजाच्या विकासासाठी या दोन्ही देशांना आपापल्या सांस्कृतिक परंपरेचे अधिष्ठान कामी येणार आहे. आज सारे जग पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्राचीन परंपरांचाही उपयोग  होतोय. वसुधैव कुटुंबकम ही विचारधारासुद्धा प्राचीन वैचारिक धन आहे. आज जागतिक पातळीवरही विचारांची गरज आहे. राम नाईक यांनी यावेळी प्राचीन परंपरांचं महत्त्व विषद केलं आहे. या संमेलनात जपानचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान यांचे व्हिडीओ संदेश दाखवण्यात आले आहेत. व्हिएतनाम उपपंतप्रधान, म्यानमारचे सांस्कृतिक मंत्री आदी नेत्यांप्रमाणेच जपान, चीन, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, मंगोलिया, थायलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील मान्यवर सहभागी झाले होते. तत्पूर्वी 3 व 4 सप्टेंबर 2015 रोजी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या संवाद या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं होतं.