शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

आशियाई देशांनी जगाचे नेतृत्व करण्यासाठी आध्यात्मिक परंपरेचे निजधन वापरावे- राम नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 10:30 IST

जागतिक मंचावरचे आशियाई देशांचे वाढते महत्त्व लक्षात घेता जगाच्या भल्यासाठी आशियाई देशांनी आपल्याकडे असलेल्या वैचारिक मूल्ये व पर्यावरणीय संस्कृतीच्या संपदेचा सुयोग्य वापर करावा

म्यानमार, दि. 6 - जागतिक मंचावरचे आशियाई देशांचे वाढते महत्त्व लक्षात घेता जगाच्या भल्यासाठी आशियाई देशांनी आपल्याकडे असलेल्या वैचारिक मूल्ये व पर्यावरणीय संस्कृतीच्या संपदेचा सुयोग्य वापर करावा, असं उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक म्हणाले आहेत. राम नाईक यांनी म्यानमारची राजधानी यंगून येथे संवाद या आंतरराष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.दिल्लीतल्या विवेकानंद इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज व जपान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंगून येथे भरलेल्या दोन दिवसीय संमेलनात संघर्ष परिस्थिती टाळा व पर्यावरणीय चेतना या विषयावर भारत, म्यानमार, जपानसहीत अनेक देशांचे नेते, विद्वान व धर्मप्रसारक आपले विचार मांडणार आहे. गौतम बुद्धांनी स्वतःच स्वतःला मार्ग दाखवा असे म्हटले होते. उपनिषदांमध्येही तत्त्व व आत्मा हे सर्वोच्च चेतनेहून भिन्न असल्याचं प्रतिपादनही राम नाईक यांनी केले.राम नाईक म्हणाले, प्राचीन काळापासून म्यानमार व भारताचे सौहार्दाचे संबंध आहेत. ते अधिकाधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या प्रयत्नांना आज यश आलंय. समाजाच्या विकासासाठी या दोन्ही देशांना आपापल्या सांस्कृतिक परंपरेचे अधिष्ठान कामी येणार आहे. आज सारे जग पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्राचीन परंपरांचाही उपयोग  होतोय. वसुधैव कुटुंबकम ही विचारधारासुद्धा प्राचीन वैचारिक धन आहे. आज जागतिक पातळीवरही विचारांची गरज आहे. राम नाईक यांनी यावेळी प्राचीन परंपरांचं महत्त्व विषद केलं आहे. या संमेलनात जपानचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान यांचे व्हिडीओ संदेश दाखवण्यात आले आहेत. व्हिएतनाम उपपंतप्रधान, म्यानमारचे सांस्कृतिक मंत्री आदी नेत्यांप्रमाणेच जपान, चीन, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, मंगोलिया, थायलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील मान्यवर सहभागी झाले होते. तत्पूर्वी 3 व 4 सप्टेंबर 2015 रोजी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या संवाद या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं होतं.