शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

म्यानमारमध्ये सैन्य आणि बंडखोरांमध्ये हिंसक चकमक, 30 सैनिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 14:43 IST

या वर्षी 1 फेब्रुवारीला झालेल्या सत्तांतरानंतर हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत.

नायपिताव:म्यानमार देशात मोठी हिंसक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. लष्कर आणि बंडखोर गटात झालेल्या चकमकीत किमान 30 सैनिक ठार झाले आहेत. म्यानमारमधील जुंटा सैन्याने परिसरातील बंडखोरांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू केलं होतं, यादरम्यान ही हिंसक चकमक झाली. रेडिओ फ्री एशियाने पीपल्स डिफेन्स फोर्सच्या सदस्यांचा हवाल्याने ही माहिती दिली आहे.

पीपल्स डिफेन्स फोर्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, "सैन्याचे वरिष्ठ कमांडर आपल्या तुकडीसह पेल टाऊनशिपकडे येत होते. त्यांच्यासोबत सैन्याची 23 वाहने होती. यादरम्यान सोमवारी सकाळी पेल टाऊनशिपच्या बाहेर बंडखोरांच्या गटाने लावलेल्या लँडमाइनवर गाडी येताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात कमांडरसह किमान 30 सरकारी सैनिक ठार झाले.''

सत्तांतरानंतर परिस्थिती बिघडली

या वर्षी 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या लष्करी बंडानंतर म्यानमारमधील परिस्थिती बिकट झाली आहे. लष्कर प्रमुख, वरिष्ठ जनरल मिंग आंग हलिंग यांनी वर्षभर आणीबाणीची स्थिती जाहीर केली. आणीबाणीनंतर लष्कराला म्यानमारच्या नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान अनेकदा हिंसक घटना घडल्या आहेत. एका रिपोर्टनुसार, मागील आठ महिन्यांत 1167 नागरिकांच्या विविध घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात सैन्य आणि बंडखोरांमध्ये हिंसक चकमकीच्या 132 घटना घडल्या आहेत. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयMyanmarम्यानमार