शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:13 IST

एकीकडे संतप्त जनतेने नेपाळी मंत्र्यांची घरे जाळली, तर दुसरीकडे आता त्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.

नेपाळमधील आंदोलन दुसऱ्या दिवशी आणखी पेटलेलं दिसत आहे. या जमावाला आवर घालणं आता सरकारला देखील कठीण होत आहे. एकीकडे संतप्त जनतेने नेपाळी मंत्र्यांची घरे जाळली, तर दुसरीकडे आता जनतेने सुरक्षा दलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. काठमांडूमध्ये निदर्शकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली आणि त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. आंदोलक नेपाळमधील बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीच्या मुद्द्यांवरून निदर्शने करत आहेत. 

सरकारने निदर्शकांना हिंसाचार थांबवून चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने राजीनामा द्यावा आणि अंतरिम सरकार स्थापन करावे, अशी मागणी आंदोलक करत आहेत. यासह पुन्हा निवडणुका घेण्याची आणि पंतप्रधानांसह सर्व खासदारांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहेत. सोमवारी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

निषेधाचे रूपांतर हिंसाचारात कसे झाले?ओली सरकारवर भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तरुणांना बेरोजगारी, आर्थिक मंदी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडायचे होते. सोमवारी हजारो तरुणांनी काठमांडूमधील संसद भवनासमोर निदर्शने केली. ते सरकारकडे सोशल मीडियावरील बंदी उठवण्याची मागणी करत होते. यातील काही लोक संसदेच्या आवारात घुसले, त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पाण्याच्या मारा केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला. मात्र, यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. 

टॅग्स :NepalनेपाळKathmanduकाठमांडू