शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:13 IST

एकीकडे संतप्त जनतेने नेपाळी मंत्र्यांची घरे जाळली, तर दुसरीकडे आता त्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.

नेपाळमधील आंदोलन दुसऱ्या दिवशी आणखी पेटलेलं दिसत आहे. या जमावाला आवर घालणं आता सरकारला देखील कठीण होत आहे. एकीकडे संतप्त जनतेने नेपाळी मंत्र्यांची घरे जाळली, तर दुसरीकडे आता जनतेने सुरक्षा दलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. काठमांडूमध्ये निदर्शकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली आणि त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. आंदोलक नेपाळमधील बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीच्या मुद्द्यांवरून निदर्शने करत आहेत. 

सरकारने निदर्शकांना हिंसाचार थांबवून चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने राजीनामा द्यावा आणि अंतरिम सरकार स्थापन करावे, अशी मागणी आंदोलक करत आहेत. यासह पुन्हा निवडणुका घेण्याची आणि पंतप्रधानांसह सर्व खासदारांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहेत. सोमवारी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

निषेधाचे रूपांतर हिंसाचारात कसे झाले?ओली सरकारवर भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तरुणांना बेरोजगारी, आर्थिक मंदी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडायचे होते. सोमवारी हजारो तरुणांनी काठमांडूमधील संसद भवनासमोर निदर्शने केली. ते सरकारकडे सोशल मीडियावरील बंदी उठवण्याची मागणी करत होते. यातील काही लोक संसदेच्या आवारात घुसले, त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पाण्याच्या मारा केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला. मात्र, यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. 

टॅग्स :NepalनेपाळKathmanduकाठमांडू