शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

रोहिंग्या मुस्लिमांना अमेरिकेने केली 3.2 कोटी डॉलर्सची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 14:23 IST

म्यानमारमधून जिवाच्या भीतीने पळून जाणाऱ्या आणि बांगलादेश व नो मॅन्स लॅंडमध्ये आश्रय घेणाऱ्या रोहिंग्यांना अमेरिकेने 3.2 कोटी डॉलर्सची मदत देऊ केली आहे.

ठळक मुद्दे25 ऑगस्टपासून राखिन प्रांतात सुरु असलेल्या हिंसक हल्ले आणि लष्करी कारवाईमुळे 4 लाख 15 हजार रोहिंग्या, हिंदूंनी पलायन केले आहे. रोहिंग्यांना केलेल्या मदतीसह अमेरिकेने2017 या आर्थिक वर्षामध्ये 9.5 कोटी डॉलर्सची मदत केल्याचे सायमन हेन्शॉव्ह यांनी स्पष्ट केले.

वॉशिंग्टन, दि. 21- म्यानमारमधून जिवाच्या भीतीने पळून जाणाऱ्या आणि बांगलादेश व नो मॅन्स लॅंडमध्ये आश्रय घेणाऱ्या रोहिंग्यांना अमेरिकेने 3.2 कोटी डॉलर्सची मदत देऊ केली आहे.  या मदतीतून संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना मदत करण्याप्रती अमेरिकेची बांधिलकी व्यक्त होते असे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना अमेरिकेच्या गृह विभागाचे प्रभारी सहाय्यक सरचिटणीस सायमन हेन्शॉव यांनी सांगितले. अमेरिकेच्या या मदतीमुळे इतर देशही रोहिंग्यांना मदत करण्यासाठी पुढे येतील अशी अपेक्षा सायमन यांनी व्यक्त केली.म्यानमारच्या नेत्या आंग सान सू की यांच्याशी अमेरिकेच्या गृह विभागाचे सचिव रेक्स टिलरसन यांनी चर्चा केल्यानंतर तसेच राखिन प्रांतामधील हिंसा रोखण्यासाठी सू की यांच्या सरकारने व्यक्त केलेल्या बांधिलकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे अमेरिकेच्या गृह विभागाने स्पष्ट केले आहे. मानवाधिकाराचे झालेले उल्लंघन आणि हिंसा या विषयांकडे लक्ष द्यावे तसेच बाधित क्षेत्रातील गावे सोडून जाणाऱ्या लोकांना मानवतेच्या आधारावर मदत करावी अशी विनंती म्यानमार सरकार आणि लष्कराकडे टिलरसन यांनी केली आहे. या मदतीमुळे बेघर झालेल्या लोकांना तात्पुरती घरे, अन्नसुरक्षा, पोषक आहाराची मदत, मानसिक आधार, पाणी, स्वच्छता, हे लाभ होतील , तसेच 4 लाख लोकांना संरक्षण, मोडकळीस आलेल्या कुटुंबांची पुन्हा बांधणी, आपत्तीची भीती कमी करण्यासाठीही या निधीचा वापर होईल असे गृहविभागाने स्पष्ट केले. रोहिंग्यांना केलेल्या मदतीसह अमेरिकेने 2017 या आर्थिक वर्षामध्ये 9.5 कोटी डॉलर्सची मदत केल्याचे सायमन हेन्शॉव्ह यांनी स्पष्ट केले.

रोहिंग्या का पळून जात आहेत ते माहिती नाही - अाँग सान सू की25 ऑगस्टपासून राखिन प्रांतात सुरु असलेल्या हिंसक हल्ले आणि लष्करी कारवाईमुळे 4 लाख 15 हजार रोहिंग्या, हिंदूंनी पलायन केले आहे. त्यातील लाखो लोक अत्यंत वाईट अवस्थेत उघड्यावर राहात आहेत. त्यांचे आरोग्य, सुरक्षा यांचा मोठा प्रश्न बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवर निर्माण झाला आहे.