शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

भारतीय मुस्लिमांबद्दल खोटं पसरवण्याचा प्रयत्न; सत्य सांगून पत्रकाराने भुट्टोंची बोलती बंद केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:20 IST

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांना मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एका पत्रकाराने सत्य सांगितल्यानंतर लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले.

Bilawal Bhutto in UN: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर भारतीय सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी जगभरात पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानकडूनही डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यातसुद्धा पाकिस्तान तोंडावर पडताना दिसत आहे. जागतिक स्तरावर भारताबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांना एका पत्रकाराने उघडं पाडलं आहे.  भुट्टो हे इस्लामाबादच्या राजनैतिक प्रतिनिधी मंडळाचा भाग आहेत. 

अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पुन्हा भारताविरुद्ध विष ओकण्याचा प्रयत्न केला. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून पत्रकार परिषदेत बोलताना बिलावल भुट्टो यांनी खोटं विधान केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील मुस्लिमांना खलनायक बनवलं जातंय असा आरोप भुट्टो यांनी केला. त्यावर एका परदेशी पत्रकाराने त्यांना असं काही विचारले की बिलावल भुट्टो यांचे तोंड बंद झाले.

"भारत इस्रायलच्या मार्गावर चालत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची कॉपी बनण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शांतता आवडत नाही. ते अशांतता पसरवत आहेत. काश्मीरमध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वापर भारतातील मुस्लिमांना खलनायक बनवण्यासाठी  केला जातोय," असं बिलावल भुट्टो म्हणाले.

त्यावर बोलताना एका पत्रकाराने बिलावल भुट्टो यांचा खोटारडेपणा सर्वांसमोर उघड केला. "मी दोन्ही देशांकडून देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक ऐकली आहे आणि मला आठवते की, ऑपरेशन सिंदूरवर भारताकडून ब्रिफिंगचे नेतृत्व एका मुस्लिम अधिकाऱ्याने केले होते," असं पत्रकाराने म्हटलं. परदेशी पत्रकाराचे बोलणं ऐकून बिलावल भुट्टो यांचा चेहरा उतरला आणि ते मान हलवत, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, असं म्हटलं.

दुसरीकडे, ऑपरेशन सिंदूरनंतर दक्षिण आशियातून दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तान आता भारताकडून सहकार्याचे आवाहन करत आहे. बिलावल भुट्टो यांनी म्हटलं की जर दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांनी एकत्र काम केले तर दहशतवाद मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. जर आयएसआय आणि रॉ एकत्र येऊन काम करण्यास तयार असतील तर भारत आणि पाकिस्तानमधील दहशतवाद लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो, असा विश्वास  बिलावल भुट्टो यांनी केला. तसेच युद्धबंदीनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाचा धोका कमी झालेला नाही, तर वाढला असल्याचेही भुट्टो म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ