शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

India-Turkey: भुकेनं त्रस्त तुर्कीला मदत म्हणून भारतानं पाठवली होती गव्हाची खेप; बदल्यात मिळालं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 03:48 IST

Turkey Rejects India Wheat Consignment : तुर्कस्तानच्या या नकारानंतर, आता भारतीय जहाज तेथून परत निघाले असून, ते जूनच्या मध्यापर्यंत गुजरातच्या कांधला पोर्टवर पोहोचेल.

स्वतःला पाकिस्तानचा आयर्न ब्रदर म्हणवून घेणारा तुर्कस्तान (Turkey) सध्या अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहे. यामुळे भारताने त्याला मदत म्हणून गव्हाची खेप पाठवली होती. मात्र त्याने ती स्वीकारण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, असे करण्यामागचे कारण सांगताना तुर्कस्तान सरकारने, असा काही युक्तिवाद केला आहे, की ज्यावर सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

भारताने पाठवलेल्या गव्हात सापडला रुबेला व्हायरस - यासंदर्भात बोलताना तुर्की सरकारच्या कृषी मंत्रालयाने म्हटले आहे, "भारताने पाठवलेल्या गव्हात रुबेला व्हायरस आढळून आला आहे. यामुळे त्यांनी पाठवलेली 56 हजार 877 मेट्रिक टन गव्हाची खेप नाकारण्यात आली आहे." तुर्कस्तानच्या या नकारानंतर, आता भारतीय जहाज तेथून परत निघाले असून, ते जूनच्या मध्यापर्यंत गुजरातच्या कांधला पोर्टवर पोहोचेल.

तुर्कीच्या विनंतीवरून पाठवण्यात आला होता 56 हजार मेट्रिक टन गहू-जगभरातील अनेक देशांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने, भारतातही गहू आणि तांदळाच्या किमती वाढायला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, मित्र देशांना त्यांची गरज आणि परस्पर संबंध लक्षात घेत गव्हाची विक्री केली जात आहे.

तुर्कस्तान आणि भारताचे संबंध चांगले नाहीत. पण त्यांनी गहू पाठवण्याची विनंती केल्यानंतर, भारत सरकारच्या सूचनेनुसार तेथे गहू पाठविण्यात आला. मात्र, पाकिस्तानच्या प्रेमात बुडालेल्या तुर्कस्तानने भारताची ही मदत नाकारून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. मोदी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर, जवळपास 12 देशांनी भारताकडे मदत मागितली आहे.

टॅग्स :IndiaभारतGujaratगुजरातCentral Governmentकेंद्र सरकार