शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

India-Turkey: भुकेनं त्रस्त तुर्कीला मदत म्हणून भारतानं पाठवली होती गव्हाची खेप; बदल्यात मिळालं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 03:48 IST

Turkey Rejects India Wheat Consignment : तुर्कस्तानच्या या नकारानंतर, आता भारतीय जहाज तेथून परत निघाले असून, ते जूनच्या मध्यापर्यंत गुजरातच्या कांधला पोर्टवर पोहोचेल.

स्वतःला पाकिस्तानचा आयर्न ब्रदर म्हणवून घेणारा तुर्कस्तान (Turkey) सध्या अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहे. यामुळे भारताने त्याला मदत म्हणून गव्हाची खेप पाठवली होती. मात्र त्याने ती स्वीकारण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, असे करण्यामागचे कारण सांगताना तुर्कस्तान सरकारने, असा काही युक्तिवाद केला आहे, की ज्यावर सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

भारताने पाठवलेल्या गव्हात सापडला रुबेला व्हायरस - यासंदर्भात बोलताना तुर्की सरकारच्या कृषी मंत्रालयाने म्हटले आहे, "भारताने पाठवलेल्या गव्हात रुबेला व्हायरस आढळून आला आहे. यामुळे त्यांनी पाठवलेली 56 हजार 877 मेट्रिक टन गव्हाची खेप नाकारण्यात आली आहे." तुर्कस्तानच्या या नकारानंतर, आता भारतीय जहाज तेथून परत निघाले असून, ते जूनच्या मध्यापर्यंत गुजरातच्या कांधला पोर्टवर पोहोचेल.

तुर्कीच्या विनंतीवरून पाठवण्यात आला होता 56 हजार मेट्रिक टन गहू-जगभरातील अनेक देशांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने, भारतातही गहू आणि तांदळाच्या किमती वाढायला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, मित्र देशांना त्यांची गरज आणि परस्पर संबंध लक्षात घेत गव्हाची विक्री केली जात आहे.

तुर्कस्तान आणि भारताचे संबंध चांगले नाहीत. पण त्यांनी गहू पाठवण्याची विनंती केल्यानंतर, भारत सरकारच्या सूचनेनुसार तेथे गहू पाठविण्यात आला. मात्र, पाकिस्तानच्या प्रेमात बुडालेल्या तुर्कस्तानने भारताची ही मदत नाकारून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. मोदी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर, जवळपास 12 देशांनी भारताकडे मदत मागितली आहे.

टॅग्स :IndiaभारतGujaratगुजरातCentral Governmentकेंद्र सरकार