शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

डोकलामचा विषय मागे राहिलाय, आता आम्ही नव्या जोमाने भारतासोबत काम करण्यास तयार - चीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 17:58 IST

डोकलामचा विषय आता मागे राहिला असून चीन आणि भारत एकत्र काम करत आपले संबंध अजून मजबूत करत असल्याचं चीनचे काऊन्सिल जनरल बोलले आहेत

कोलकाता - डोकलामचा विषय आता मागे राहिला असून चीन आणि भारत एकत्र काम करत आपले संबंध अजून मजबूत करत असल्याचं चीनचे काऊन्सिल जनरल बोलले आहेत. चीनचे काऊन्सिल जनरल झनवू यांनी एकमेकांना सहकार्य करण्यावर भर दिला जात असल्याचंही सांगितलं आहे. 'भारत आणि चीन एकत्र काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जीनपिंग यांच्यात 5 सप्टेंबर झालेल्या बैठकीत संबंध अजून मजबूत कसे करता येतील यावर चर्चा झाली', अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पिपल्स रिपब्लिक ऑफ चीनच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

'जोपर्यंत दोन्ही देश एकत्र काम करतील तोपर्यंत सहकार्य आणि विकासावर भर देणं सोपं जाईल', असा विश्वास झनवू यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही देशांनी डोकलमाचा वाद मागे सोडला आहे का असं विचारलं असता , 'हो आम्ही तो मुद्दा मागेच सोडला असून द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासाठी काम करत आहोत', असं सांगितलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जीनपिंग यांची 5 सप्टेंबर रोजी ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भेट झाली होती. यावेळी दोन्ही देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने एकमेकांना सहकार्य करण्याची गरज असून, डोकलामसारखा वाद पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं होतं.

16 जून रोजी चिनी लष्करानं सिक्कीम सेक्टरमधील डोकलाम येथे रस्ता बांधण्यास सुरुवात केली होती. त्यांचं हे अतिक्रमण थोपवण्यासाठी भूताननं भारताची मदत मागितली होती. त्यानंतर, भारतीय लष्कर त्यांच्या मदतीला धावून गेलं होतं. चीनच्या रस्ताबांधणीला भारताने विरोध केल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. 

28 ऑगस्ट रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने भारत आणि चीन आपापसातील सहमतीने सैन्य मागे घेण्यास तयार असल्याचं जाहीर केलं होतं. 

काय होता डोकलामचा वाद?चीननं चुंबी खोऱ्यातल्या याटुंग आणि डोकलाममध्ये रस्ते बांधण्याचं काम हाती घेतलं, या कामाला भारतानं कडाडून विरोध दर्शविला, मात्र या विरोधाकडे चीननं सपशेल दुर्लक्ष केलं, ज्यानंतर भारतानं लक्ष ठेवण्यासाठी बंकर उभारले, भारतानं उभारलेले दोन बंकर चिनी सैन्यानं उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर भारतानं आपल्या लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली आणि नेमक्या याच कारणावरून दोन्ही देशांमध्ये तणाव चांगलाच वाढला.  

टॅग्स :DoklamडोकलामNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन