शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये तीन रोहिंग्या मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 12:14 IST

म्यानमारमधून वांशिक दंगलींना घाबरुन पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. पळून गेलेले रोहिंग्या पुन्हा म्यानमारमध्ये येऊ नयेत यासाठी म्यानमारच्या लष्कराने बांगलादेशाच्या सीमेवर भूसुरुंग पेरले आहेत.

ठळक मुद्देरोहिंग्यांच्या प्रश्नाची तुलना आता रवांडा किंवा सेब्रेंनिका येथील वंशच्छेदाशी केली जात आहेजगभरातील मानवाधिकार कार्यकर्ते या वांशिक दंगलींचा निषेध करत आहेत. भारतात घुसलेल्या 40 हजार रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारमध्ये पाठवण्यात येऊ नये अशी याचिका ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

ढाका, दि.11- म्यानमारमधून वांशिक दंगलींना घाबरुन पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. पळून गेलेले रोहिंग्या पुन्हा म्यानमारमध्ये येऊ नयेत यासाठी म्यानमारच्या लष्कराने बांगलादेशाच्या सीमेवर भूसुरुंग पेरले आहेत. याच भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये तीन रोहिंग्याचे प्राण गेल्याचे वृत्त ढाका ट्रिब्युन वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे. स्फोटाची ही घटना नायखोमगचारी य़ेथे झाली आहे.

हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवा! नगरमधील मुस्लिमांनी निषेध करावा हे भयंकरच - उद्धव ठाकरेअराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने या घटनेचा तीव्र निषेध केला असून म्यानमारमधील रोहिंग्यांची स्थितीबद्दल तेथिल सरकारवर निशाणा साधला आहे. अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीविरोधात आमची लढाई सुरु आहे अशी माहिती म्यानमार सरकारने दिली आहे. म्यानमार सरकारने अराकान आर्मीला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

यूएनएचसीआरच्या माहितीनुसार म्यानमारमधील राखिन प्रांतातील तणावामुळे आता पर्यंत 2 लाख साठ हजार रोहिंग्यांनी बांगलादेशकडे पलायन केले आहे. यामुळे बांगलादेशातील सीमाप्रदेशातील व्यवस्था कोलमडली आहे. बांगलादेशाने रोहिंग्यांना सीमा खुल्या केल्या नसल्यामुळे आडवाटेने, जलमार्गाने लोक बांगलादेशात घुसत आहेत. बांगलादेश आणि म्यानमारमध्ये असणारी नैसर्गिक सीमा म्हणजे नेप नदीला ओलांडूनही रोहिंग्या बांगलादेशात जात आहेत. रात्रीच्या वेळेस धोका पत्करुन जाणाऱ्या या रोहिंग्यांच्या बोटी उलटण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू ची यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी दबाव येत आहेत. म्यानमार लष्कराने रोहिंग्या राखिन प्रांतामध्ये तणाव निर्माण करत आहेत असे सांगून रोहिंग्या स्वतःच स्वतःची घरे पेटवून देत आहेत असेही म्हटले आहे.

रोहिंग्यांच्या प्रश्नाची तुलना आता रवांडा किंवा सेब्रेंनिका येथील वंशच्छेदाशी केली जात आहे. जगभरातील मानवाधिकार कार्यकर्ते या वांशिक दंगलींचा निषेध करत आहेत. भारतात घुसलेल्या 40 हजार रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारमध्ये पाठवण्यात येऊ नये अशी याचिका ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.