शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
5
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
6
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
7
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
8
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
9
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
10
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
11
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
12
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
13
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
14
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
15
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
16
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
17
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
18
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
19
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
20
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार

भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये तीन रोहिंग्या मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 12:14 IST

म्यानमारमधून वांशिक दंगलींना घाबरुन पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. पळून गेलेले रोहिंग्या पुन्हा म्यानमारमध्ये येऊ नयेत यासाठी म्यानमारच्या लष्कराने बांगलादेशाच्या सीमेवर भूसुरुंग पेरले आहेत.

ठळक मुद्देरोहिंग्यांच्या प्रश्नाची तुलना आता रवांडा किंवा सेब्रेंनिका येथील वंशच्छेदाशी केली जात आहेजगभरातील मानवाधिकार कार्यकर्ते या वांशिक दंगलींचा निषेध करत आहेत. भारतात घुसलेल्या 40 हजार रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारमध्ये पाठवण्यात येऊ नये अशी याचिका ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

ढाका, दि.11- म्यानमारमधून वांशिक दंगलींना घाबरुन पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. पळून गेलेले रोहिंग्या पुन्हा म्यानमारमध्ये येऊ नयेत यासाठी म्यानमारच्या लष्कराने बांगलादेशाच्या सीमेवर भूसुरुंग पेरले आहेत. याच भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये तीन रोहिंग्याचे प्राण गेल्याचे वृत्त ढाका ट्रिब्युन वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे. स्फोटाची ही घटना नायखोमगचारी य़ेथे झाली आहे.

हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवा! नगरमधील मुस्लिमांनी निषेध करावा हे भयंकरच - उद्धव ठाकरेअराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने या घटनेचा तीव्र निषेध केला असून म्यानमारमधील रोहिंग्यांची स्थितीबद्दल तेथिल सरकारवर निशाणा साधला आहे. अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीविरोधात आमची लढाई सुरु आहे अशी माहिती म्यानमार सरकारने दिली आहे. म्यानमार सरकारने अराकान आर्मीला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

यूएनएचसीआरच्या माहितीनुसार म्यानमारमधील राखिन प्रांतातील तणावामुळे आता पर्यंत 2 लाख साठ हजार रोहिंग्यांनी बांगलादेशकडे पलायन केले आहे. यामुळे बांगलादेशातील सीमाप्रदेशातील व्यवस्था कोलमडली आहे. बांगलादेशाने रोहिंग्यांना सीमा खुल्या केल्या नसल्यामुळे आडवाटेने, जलमार्गाने लोक बांगलादेशात घुसत आहेत. बांगलादेश आणि म्यानमारमध्ये असणारी नैसर्गिक सीमा म्हणजे नेप नदीला ओलांडूनही रोहिंग्या बांगलादेशात जात आहेत. रात्रीच्या वेळेस धोका पत्करुन जाणाऱ्या या रोहिंग्यांच्या बोटी उलटण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू ची यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी दबाव येत आहेत. म्यानमार लष्कराने रोहिंग्या राखिन प्रांतामध्ये तणाव निर्माण करत आहेत असे सांगून रोहिंग्या स्वतःच स्वतःची घरे पेटवून देत आहेत असेही म्हटले आहे.

रोहिंग्यांच्या प्रश्नाची तुलना आता रवांडा किंवा सेब्रेंनिका येथील वंशच्छेदाशी केली जात आहे. जगभरातील मानवाधिकार कार्यकर्ते या वांशिक दंगलींचा निषेध करत आहेत. भारतात घुसलेल्या 40 हजार रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारमध्ये पाठवण्यात येऊ नये अशी याचिका ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.