शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उभी रात्र त्यांनी थंडीत कुडकुडत घालवली, नेपाळमध्ये हजारो बेघर; मृत्यूसंख्या १५७ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 07:20 IST

रात्री लोकांनी प्लास्टिकच्या चादरी आणि जुने कपडे वापरले. घरांच्या ढिगाऱ्याखालून सामान बाहेर काढता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत.  

काठमांडू : शनिवारी रात्री कडाक्याची थंडी असूनही नेपाळच्या वायव्य भागातील डोंगराळ गावांमधील हजारो लोकांना भूकंपामुळे बाहेर रस्त्यावर कुडकुडत झोपावे लागले. नेपाळमधीलभूकंपात किमान १५७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, मोठ्या संख्येने घरांचे नुकसान झाले.

नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री अचानक आलेल्या भूकंपामुळे हजारो घरांचे नुकसान झाले आहे. चिउरी गावातील रहिवासी लाल बहादूर बिका यांनी भूकंपात ठार झालेल्या १३ लोकांच्या पांढऱ्या कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहांकडे बोट दाखवत सांगितले, आम्ही आमच्या गावांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची वाट पाहत आहोत आणि जखमी लोकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे.

रात्री लोकांनी प्लास्टिकच्या चादरी आणि जुने कपडे वापरले. घरांच्या ढिगाऱ्याखालून सामान बाहेर काढता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत.  सरकारने मदतीसाठी तंबू, अन्न आणि औषधे पाठविली आहेत.

माझे अर्धे शरीर ढिगाऱ्याखाली गेले...- रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींपैकी बिमल कुमार कार्की म्हणाले की, मी गाढ झोपेत होतो तेव्हा अचानक सर्व काही भयानकपणे थरथर कापू लागले. मी पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण माझे संपूर्ण घर कोसळले. - मी पळण्याचा प्रयत्न केला; पण माझे अर्धे शरीर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. कार्की म्हणाले की, मी ओरडलो, पण माझे शेजारी घरांमध्येही सारखीच स्थिती होती आणि मदतीसाठी लोक ओरडत होते. बचाव कर्मचाऱ्यांना माझ्यापर्यंत पोहोचायला अर्धा ते एक तास लागला.

टॅग्स :NepalनेपाळEarthquakeभूकंप