शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
4
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
5
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
6
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
7
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
8
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
9
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
10
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
11
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
12
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
13
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
14
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
15
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
16
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
17
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
18
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
19
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

'या' पाच कारणांमुळे श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिम आले समोरासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 17:49 IST

बौद्ध आणि मुस्लिम या दोन समजांमधील हा संघर्ष अचानक भडकलेला नाही. मागच्या वर्षभरापासून या दोन समाजांमध्ये असणाऱ्या तणावाने आता हिंसेचे रुप घेतले आहे.

नवी दिल्ली - कँडीमध्ये सुरु झालेली धार्मिक दंगल देशामध्ये पसरू नये यासाठी संपूर्ण श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. बौद्ध आणि मुस्लिम या दोन समाजांमधील हा संघर्ष अचानक भडकलेला नाही. मागच्या वर्षभरापासून या दोन समाजांमध्ये असणाऱ्या तणावाने आता हिंसेचे रुप घेतले आहे. श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिम समोरासमोर येण्यामागे ही पाच प्रमुख कारणे आहेत. 

- धर्मांतर हे या हिंसाचाराचे मुख्य कारण आहे. श्रीलंकेत बौद्धांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात असल्याचा आरोप काही प्रखर बौद्ध संघटनांकडून करण्यात येत होता. 

- श्रीलंकेत प्राचीन बौद्ध स्थळांची तोडफोड करण्यात आली त्यामागेही मुस्लिम संघटना असल्याचा आरोप करण्यात आला.                                        -  म्यानमारमध्ये हिंसाचार सुरु असल्याने रोहिंगे मुस्लिम श्रीलंकेमध्ये आश्रयाला आले. त्यांना देशात थारा देऊ नये यासाठी काही राष्ट्रवादी बौद्ध संघटनांनी जोरदार आंदोलनही केले होते. 

- सध्या हिंसाचार फक्त कँडी शहरात झाला आहे. पण देशाच्या अन्य भागातही हा हिंसाचार वेगाने पसरु शकतो असे अलजजीरा वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. 

- श्रीलंकेत यापूर्वीही जातीय हिंसाचारात अनेकांचे प्राण गेले आहेत. श्रीलंकेत एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के मुस्लिम आहेत. 75 टक्के बौद्ध आणि 13 टक्के हिंदू आहेत. 

- फेब्रुवारी महिन्यातही बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच जण जखमी झाले होते. अनेक दुकाने आणि मशिदींची नासधूस करण्यात आली होती. 

- 2015 मध्ये सत्ता मिळवल्यानंतर राष्ट्रपती सिरिसेना यांनी मुस्लिम विरोधी हिंसाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पण त्यात पुढे फारशी प्रगती झाली नाही. 

 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका