शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

बुद्ध आणि गांधीच्या भूमीत असहिष्णुतेला थारा नाही - नरेंद्र मोदी

By admin | Updated: November 12, 2015 21:17 IST

भारत बुद्ध आणि गांधी यांची भूमी आहे, येथे असहिष्णुतेला थारा नाही प्रत्येक नागरिकांच्या विचारांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. १२ -  भारत बुद्ध आणि गांधी यांची भूमी आहे, येथे असहिष्णुतेला थारा नाही प्रत्येक नागरिकांच्या विचारांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे असे मत भारतातील असहिष्णुतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटन मध्ये व्याक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) पासून तिन दिवसाच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. लंडनमध्ये किंग्ज चार्ल्स स्ट्रीट येथील ट्रेझरी क्वार्डेंगलवर ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरुन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' सन्मानित केले. 'गार्ड ऑफ ऑनर' मिळालेले ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान आज चार वाजताच्या सुमारास लंडनमध्ये पोहोचले आहेत. मोदींचे स्वागत करण्यासाठी जेम्स कोर्टवर येथे त्यांचे मोठे समर्थक जमले होते. यावेळी 'मोदी मोदी' आणि 'भारत माता की जय' अशा घोषणा देण्यात आल्या. मोदींनी येथील नागरिकांकाडून शुभेच्छा स्विकारल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्यात द्विपक्षीय संबंधांवर संयुक्त पत्रकार परिषद झाली. यामध्ये दोन्ही देशाचे संबंध सुधारण्यावर भर दिला जाईल अशी अपेक्षा आहे. दोन्ही देशातील संबंध एकमेकांसाठी तसेच जगासाठी आणि मानवतेसाठी फायदेशीर आणि उपयोगी ठरतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. > संयुक्त पत्रकार परिषदतेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत -- भारत-ब्रिटनचे संबंध अधिक मजबूत होतील, नद्यांच्या स्वच्छतेसाठी मदत करण्यावर चर्चा - सायबर सुरक्षेसंदर्भात ब्रिटनसोबत काम करणार - दोन्ही देशातील संबंध एकमेकांसाठी तसेच जगासाठी आणि मानवतेसाठी फायदेशीर आणि उपयोगी ठरतील - भारत बुद्ध आणि गांधी यांची भूमी आहे. प्रत्येक नागरिकांच्या विचारांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे - भारताचा ब्रिटनसोबत नागरी अणूकरार - देशाच्या कानकोपऱ्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेबाबत सरकार गंभीर- दहशतवाद हा राष्ट्रव्यापी मुद्दा आहे, भारत-ब्रिटन दोन्ही देशांना दहशतवादाचा त्रास >> मोदी नॉट वेलकम... बिहार निवडणुकीतील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ब्रिटन दौऱ्याच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू झाले आहे. मोदींच्या विरोधात आवाज संघटनेच्या वतीने इंग्लंडच्या संसदेबाहेर पोस्टरही लावण्यात आले आहेत. 'मोदी नॉट वेलकम' नावाच्या या कँपेनचे नेतृत्त्व 'आवाज नेटवर्क' करत आहे.