शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

'एअर स्ट्राईकमध्ये एकाही पाकिस्तानी सैनिकाचा मृत्यू नाही', पाक म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 09:42 IST

भारताने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर 26 फ्रेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक केला होता

नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. बालाकोटच्या कारवाईत एकाही पाकिस्तानी सैन्याचा किंवा नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याचे स्वराज यांनी स्पष्ट केलंय. अहमदाबाद येथे भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना स्वराज यांनी हे बाब स्पष्ट केली. त्यानंतर, पाकिस्तानने यावर प्रतिक्रिया देत, अखेर सत्य समोर आलेच, असे म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर 26 फ्रेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक केला होता. जैश ए मोहम्मदकडून 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला आणि स्व-संरक्षणासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केल्याचं भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगितलं आहे. तसेच या कारवाईत कुठल्याही पाकिस्तानी नागरिकांचा आणि सैन्याचा मृत्यू झाला नसल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे. सुषमा स्वराज यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखेर सत्य समोर आलेच, त्याचप्रमाणे 2016 मधील सर्जिकल स्ट्राईकचे सत्य समोर येईल. तसेच, पाकिस्तानच्या दोन विमानांना पाडण्यात आल्याचे आणि एफ 16 बाबतही लवकरच सत्य बाहेर येईल, असा खोचक टोला पाकिस्तानने लगावला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याचं लक्ष्य केवळ जैश ए मोहम्मदच्या लष्करी तळावर हल्ला करणे हेच होते. त्यामुळेच, या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्य किंवा नागरिक ठार मारला जाणार नाही, याची काळजी भारताने घेतली होती. त्यामुळेच जगभरातील देशांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. दरम्यान, या मेळाव्यात बोलताना, देशाला बहुमताच्या सरकारची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndian Armyभारतीय जवानSushma Swarajसुषमा स्वराजPakistanपाकिस्तानElectionनिवडणूक