शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

हाफिज सईद 'साहेबां'विरोधात कोणताही गुन्हा नाही, पाकच्या पंतप्रधानांची मुक्ताफळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 15:38 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला 'साहेब' असे संबोधले आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला 'साहेब' असे संबोधले आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी हाफिज सईद साहेबांविरोधात पाकिस्तानात कोणताही गुन्हा दाखल नाही, असं वादग्रस्त विधान केलं आहे. पाकिस्तानमधल्या जिओ टीव्हीनं काल घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत. हाफिज सईद साहेबांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यानं आम्ही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू शकत नाही. कोणी तरी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवल्यास आम्ही कारवाई करू शकतो, असंही शाहीद खकान अब्बासी म्हणाले आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा होत असल्यानं भारत-पाकमध्ये युद्ध होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचंही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी स्पष्ट केलं आहे. 

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले होते. मात्र पाकिस्तानमध्ये राजकारणी आणि लष्कराकडून त्याला अद्यापही पाठिंबा मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी हाफिझ सईदची बाजू घेतल्यानंतर आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हाफिस सईदची तळी उचलताना त्याने प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणेच काश्मीर समस्या सोडवण्यासाठी सक्रिया भूमिका घेतली आहे, असे बाजवा यांनी म्हटले होते. पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा सिनेट कमिटीच्या बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीत बोलले होते. त्यावेळी त्यांनी राजकारण, दहशतवादविरोधी कारवाई आणि परराष्ट्र धोरण या मुद्द्यांवर भाष्य केले होते. जेव्हा बाजवा यांना देशासाठी संघर्ष करण्यामध्ये हाफिझ सईद याची भूमिका, विशेषकरून काश्मीरप्रश्नी घेतलेल्या भूमिकेबाबत विचारले असता, प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणेच हाफिझ सईद हासुद्धा काश्मीरचा प्रश्न उपस्थित करू शकतो, असे त्यांनी सांगितले होते.काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी कट्टर दहशतवादी संघटना आणि भारतविरोधी कारवाया करून काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवणाऱ्या लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उल-दावा यांसारख्या दहशतवादी संघटनांबरोबर निवडणुकीसाठी युती करणार असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले होते. लष्कर आणि जमात उल दावा या दहशतवादी संघटना देशभक्त असल्याचा उल्लेखही मुशर्रफ यांनी केला होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानhafiz saedहाफीज सईदIndiaभारत26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला