शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:24 IST

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर लावण्यात आलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर एस जयशंकर यांनी रशियासोबत व्यापार वाढवण्यावर भर दिला

मॉस्को - भारताने रशियन सैन्यात भारतीय नागरिकांच्या भरतीचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशियाचे मंत्री सर्गेई लावरोव यांच्या भेटीत हा मुद्दा मांडला. त्यानंतर रशियानेही भारताच्या मागणीवर योग्य ती पाऊले उचलून लवकरच हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करू असा शब्द दिला आहे. युक्रेन युद्धाच्या काळात रशियाने मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांना त्यांच्या सैन्यदलात भरती केले. ज्यात भारतीयांचाही समावेश आहे. त्यानंतर भारत सातत्याने रशियावर भारतीय नागरिकांना त्यांच्या सैन्यातून हटवून त्यांना मायदेशी पाठवण्याची मागणी करत आहे.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्यासोबतच्या चर्चेत एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा रशियन सैन्यातील भारतीयांचा मुद्दा मांडला. मागील काळात अनेक भारतीयांची रशियाने सैन्यातून सुटका केली आहे परंतु आजही काही प्रकरणे प्रलंबित आहेत, काही लोक बेपत्ता आहेत. जयशंकर यांनी लावरोव यांना म्हटलं की, रशिया तातडीने यावर तोडगा काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. भारताने याआधीही रशियासमोर हा मुद्दा उचलला होता. त्यानंतर रशियानेही मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांना त्यांच्या सैन्यातून हटवले होते. परंतु त्यातील काही दुर्गम भागात, सक्रीय सैन्य संघर्षात सहभागी असल्याने त्यांच्या परतण्यास विलंब होत आहे. 

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर लावण्यात आलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर एस जयशंकर यांनी रशियासोबत व्यापार वाढवण्यावर भर दिला. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आयोजित भारत-रशिया बिझनेस फोरममध्ये ते बोलत होते. रशियाकडून तेल खरेदीमुळे अमेरिकन ट्रम्प प्रशासन भारतावर टॅरिफ लावत आहे. रशियाशी व्यापार करून भारत एकप्रकारे युक्रेन युद्धात त्याची मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेचा आहे. त्याच आरोपातून अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ भारतावर लावला आहे. येत्या २७ ऑगस्टपासून हा टॅरिफ ५० टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल. 

दहशतवादाविरोधात एकत्रित लढणार

भारत आणि रशिया दहशतवादाचा निषेध करते, आम्ही दोन्ही देश मिळून दहशतवादाला उत्तर देऊ. भारत रशियातील संबंध खूप जुने आहेत. जगात आजही सर्वात मजबूत संबंधांपैकी भारत-रशियाचे नाव आहे. एस जयशंकर यांनी पाकिस्तानचे नाव न घेता भारत आणि रशिया दोघे दहशतवादाला चोख उत्तर देऊ असं विधान केले. लोकांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही. सीमेपलीकडून झालेल्या हल्ल्याला भारत सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकसारखी कारवाई करण्यास मागे हटणार नाही हे भारताने आधीच दाखवून दिले आहे असंही जयशंकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :russiaरशियाIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकरAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प