शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 17:11 IST

India Pakistan Tension Update: स्वतःहून शस्त्रसंधीचा प्रस्ताव देऊन ती धुडकावून लावणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान मोदींनी निर्वाणीचा इशारा दिला. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासोबत मोदींची चर्चा झाली. त्यावेळी मोदी भारताची भूमिका स्पष्ट केली.

India Pakistan Ceasefire Update: 'पाकिस्तानने जर काही केलं, तर भारताचे उत्तर विनाशकारी आणि कठोर असेल. जसे पाकिस्तानने २६ ठिकाणांना लक्ष्य केल्यानंतर दिले गेले', अशा स्पष्ट शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यात चर्चा झाली. यावेळी मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

न्यूयॉर्क टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पहिला प्रहार ६-७ मेच्या रात्री केला. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. तेव्हापासून दोन्ही देशातील लष्करी संघर्ष वाढला आहे. 

मोदींनी अमेरिकेला काय सांगितलं?

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यात चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, 'जर पाकिस्तानने काही केलं, तर त्याला विनाशकारी आणि तीव्र उत्तर दिलं जाईल. जसे की पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर दिलं गेलं होतं. भारताने त्यांच्या तळांवरच हल्ले केले", असे मोदी व्हान्स यांच्याशी बोलताना म्हणाले. 

वाचा >>'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले

पाकिस्तानकडून पहिल्यांदा हल्ला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासूनच पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यास सुरूवात झाली. भारताने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केल्यानंतर पिसाळलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्काराची ठिकाणे आणि गावांवरच हवाई हल्ल्याचे प्रयत्न केले. 

भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांना केले लक्ष्य

८-९ मेच्या रात्री पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या आणि हवाई दलाच्या ठिकाणांसह नागरी वस्त्यांवरही हल्ले करण्याचे प्रयत्न केले. ते हाणून पाडल्यानंतर भारतीय लष्कराने मिसाईल आणि लढाई विमानांच्या सहाय्याने पाकिस्तानच्या तीन हवाई तळांवर हल्ले केले. त्याचबरोबर पाकिस्तानच्या शस्त्र भांडारालाही लक्ष्य करण्यात आले.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक