शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

...तर मृतदेह तीन दिवस चौकात लटकवा! मुशर्रफ यांना कोर्टाने दिला हाेता मृत्यूदंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 10:54 IST

जर मुशर्रफ यांचा शिक्षेपूर्वी मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेह तीन दिवस इस्लामाबादमधील डी चौकात लटकविण्यात येईल, असे या निर्णयात म्हटले होते. मात्र, नंतर लाहोर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली.

परवेज मुशर्रफ यांना २०१९मध्ये इस्लामाबादमधील विशेष न्यायालयाने संविधान बदलल्याच्या देशद्रोहाच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. देशाच्या इतिहासात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले ते पहिले लष्करी शासक होते. जर मुशर्रफ यांचा शिक्षेपूर्वी मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेह तीन दिवस इस्लामाबादमधील डी चौकात लटकविण्यात येईल, असे या निर्णयात म्हटले होते. मात्र, नंतर लाहोर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली.

निष्फळ ठरलेली मुशर्रफ-अडवाणी भेट४ जुलै २००१ रोजी आग्रा येथे भारत-पाकिस्तान परिषदेची पार्श्वभूमी तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी तयार केली होती. आग्रा परिषदेत मुशर्रफ आणि अडवाणी यांच्यात चर्चेची पहिली फेरी झाली. त्यात दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमध्ये लपून बसलेल्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे मान्य केले होते. 

यानंतर अडवाणी यांनी या कराराची औपचारिक अंमलबजावणी होण्यापूर्वी तुम्ही १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असलेल्या दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी केली, ती अर्थातच हट्टी मुशर्रफ यांनी अमान्य केली.

भारतासोबत  महत्त्वाचे टप्पे --जून १९६४ : मुशर्रफ पाकिस्तान सैन्यात दाखल.-भारताविरुद्धच्या १९६५ आणि १९७१च्या युद्धात त्यांनी भाग घेतला होता.-१९९८ मध्ये लष्करप्रमुखपदी निवड.-मुशर्रफ यांनी कारगिल युद्धासाठी मैदान तयार केले. तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचे भारतीय समकक्ष अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत लाहोरमध्ये ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली.-या युद्धात त्यांना पराभव पत्करावा लागल्याने जगभरात पाकिस्तानची नाचक्की.

मुशर्रफ यांचे दिल्लीतील निवासस्थान.-ऑक्टोबर १९९९ : पंतप्रधान नवाझ शरीफ यांची हकालपट्टी करून मुख्य कार्यकारी म्हणून पदभार स्वीकारला.-जून २००१ : तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद रफिक तरार यांच्या राजीनाम्यानंतर मुशर्रफ यांनी स्वत:ला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले.-जुलै २००१ : मुशर्रफ-पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यात आग्रा परिषद. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर करार होऊ न शकल्याने परिषद अयशस्वी.-जानेवारी २००४ : पंतप्रधान वाजपेयी यांनी इस्लामाबाद येथे १२व्या सार्क परिषदेत मुशर्रफ यांच्याशी थेट चर्चा केली अन् संवादाची प्रक्रिया सुरू झाली.

टॅग्स :Pervez Musharrafपरवेझ मुशर्रफPakistanपाकिस्तानCourtन्यायालय